शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

उपांत्य लढतीत भारतीय पूर्ण क्षमतेने लढतील : शास्त्री

By admin | Updated: March 31, 2016 03:11 IST

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी

‘‘आतापर्यंत आम्ही स्पर्धेत आमच्या क्षमतेच्या तुलनेत केवळ ७०% खेळ केला असल्याचे माझे अजूनही ठाम मत आहे. अजूनही कामगिरीत सुधारणा करता येऊ शकते आणि गुरुवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही पूर्ण क्षमतेने खेळू अशी आशा आहे,’’ असे मत भारतीय संघाचे निर्देशक रवी शास्त्री यांनी मांडले. त्याचवेळी त्यांनी संघातील इतर खेळाडूंनीही पूर्ण क्षमतेने खेळ करण्याची गरज असल्याचे सांगितले.वानखेडे स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या उपांतय सामन्याच्या पूर्वसंध्येला शास्त्री यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘अजूनपर्यंत संघाची क्षमतेनुसार पूर्ण कामगिरी झालेली नाही. सर्वच प्रमुख खेळाडू आपल्या लौकिकानुसार कामगिरी करण्यात अपयशी ठरले असले तरी, उपांत्य लढतीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि सुरेश रैना नक्कीच स्वत:ला सिद्ध करतील.’’ त्याचबरोबर, ‘‘उपांत्य फेरीच्या या निर्णायक लढतीत संघाचा सर्वोत्तम खेळ होणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्ही केवळ एखाद - दुसऱ्या खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी ६ - ७ खेळाडूंच्या चमकदार कामगिरीची संघाला आवश्यकता आहे. स्पर्धेत आतापर्यंत असे झाले नसले, तरी उपांत्य लढतीत असा खेळ होण्याची शक्यता आहे,’’ असेही शास्त्री यांनी सांगितले.