शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा मालिका विजय

By admin | Updated: June 23, 2016 01:55 IST

टी-२० मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली

हरारे : टी-टष्ट्वेन्टी मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली. बरिंदर सरन याने मोक्याच्या क्षणी संतुलन ढळू न देता केलेल्या अचूक गोलंदाजीच्या बळावर भारताने शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेची विकेट काढत ३ धावांनी विजय मिळविला. भारताने केदार जाधव (५८) याच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर २० षटकांत ६ बाद १३८ धावांचे आव्हान उभे केले. तुलनेने या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने २० षटकांत ६ बाद १३५ धावांत रोखले. भारताच्या गोलंदादाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले होते. शेवटच्या षटकांत त्यांना विजयासाठी २१ धावा आवश्यक होत्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोणीने सरन याच्याकडे चेंडू सोपविला. पहिल्याच चेंडूवर टिमीसेन मारूमा (१३ चेंडूत नाबाद २३ धावा) षटकार खेचला. त्यानंतरचा चेंडू वाईड गेला. पाठोपाठच्या नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे एकाच वैध चेंडूवर झिम्बाब्वेला १२ धावा मिळाल्या. फ्री हिट व त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यात सरनला यश मिळाले. त्यानंतर मारुमाने एक धाव घेत एल्टन चिगुंबुराकडे (१६ चेंडूत १६ धावा) पुढील जबाबदारी सोपविली. चिगुंबुराने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेला चार धावांची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चिगुंबुराने युजुवेंद्र चहलकडे झेल दिला. त्यामुळे त्यांना सामन्यासह मालिका देखील गमावली. चामू चिभाभा (५), हॅमिल्टन मसाकाद्झा (१५) ही सलामीची जोडी परतल्यानंतर वुसी सिबांदा (२८), पीटर मूर (२६) यांच्या खेळीने झिम्बाब्वेने विजयाचे आव्हान कायम ठेवले. तत्पूवी, भारताला सलामीवीर लोकेश राहुल (२२), मनदीप सिंग (४), अंबाती रायुडू (२०), मनिष पांडे (०) ठराविक अंतराने बाद झाले. त्या नंतर आलेल्या केदार जाधव याने ४२ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ५८ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल याने ११ चेंडूत एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद २० धावा फटकाविल्या. वनडेच्या तुलनेत टी-२० स्पर्धेत युवा खेळाडूंना अधिक शिकायला मिळाले. या खेळाडूंचा हा अनुभव त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. झिम्बाब्वे संघाने चांगले प्रदर्शन केले. या मालिकेतून संघाला १०-१२ गोलंदाजांची फळी तयार करण्यास मदत मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात आपल्याला चांगले खेळाडू तयार करण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो, की आमच्याकडे खेळाडू असे आहेत जे देशासाठी आगामी काळात खेळू शकतात. वनडे मालिका ३-०ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका २-१ ने जरी जिंकली असली, तरी संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली आहे.- महेंद्रसिंह धोनी धावफलक : भारत : २० षटकांत ६ बाद १३८ धावा, लोकेश राहुल २२ त्रि.गो. मादझिव्हा, अंबाती रायुडु झे. एल्टन चिगुम्बुरा गो. ग्रॅमी क्रेमर २०, केदार जाधव झे. चिगुंबुरा गो. डोनाल्ड तिरिपानो ५८, एमएस धोणी त्रि.गो. तिरिपानो ९, अक्षर पटेल नाबाद नाबाद२०, धवल कुलकर्णी नाबाद १. झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १३५; चामू चिभाभा झे. यजुवेंद्र चहल गो. बरिंंदर शरण ५, हॅमिल्टन हसाकाद्झा पायचित गो. अक्षर पटेल १५, उसीसी सिबांदा पायचित गो. धवल कुलकर्णी २८, पीटर मूर झे. मनदीप सिंग गो. चहल २६, एल्टन चिगुम्बुरा झे. चहल गो. शरण १६, टिमीसेन मारुमा नाबाद २३.