शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान सामना धरमशाळाऐवजी इडन गार्डन्सवर

By admin | Updated: March 9, 2016 17:25 IST

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर नियोजित तारखेला हा सामना होईल.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. ९ - आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तानमध्ये धरमशाळा येथे होणा-या सामन्याचे स्थळ अखेर आयसीसीने बदलले आहे. धरमशाळा ऐवजी कोलकात्यातील इडन गार्डन्स स्टेडियमवर हा सामना होईल. १९ मार्चलाच ठरलेल्या वेळेनुसार हा सामना खेळवला जाईल असे आयसीसीचे पदाधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले. 
सुरक्षेच्या कारणास्तव सामन्याचे नियोजित स्थळ बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला असे रिचर्डसन यांनी सांगितले. कोलकात्यातील ऐतिहासिक इडन गार्डन्स स्टेडियमवर  भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो अशी शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती. 
हिमाचलप्रदेश सरकारने सुरुवातीला सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था देण्यास नकार दिला होता. नंतर ते सुरक्षा देण्यास तयार होते. पण मंगळवारी पाकिस्तानातून आलेल्या व्दिसदस्यीय शिष्टमंडळाने धरमशाळा येथील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे धरमशाळाऐवजी कोलकात्याला सामना हलवला जाण्याची शक्यता होती. अखेर कोलकात्याला या सामन्याच्या आयोजनाची संधी मिळाली आहे. 
भारत-पाकिस्तान मालिका आयोजनाची चर्चा करण्यासाठी मुंबईत आलेल्या पीसीबी अध्यक्षांची बीसीसीआय अध्यक्ष सशांक मनोहर यांच्या बरोबरची  बैठक शिवसैनिकांनी उधळल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बीसीसीआय-पीसीबीची बैठक आयोजित करण्याची तयारी दाखवली होती. भारतात सर्व सामन्यांच्या स्थळी कडेकोट सुरक्षा बंदोबस्ताचे आम्हाला आश्वासन देण्यात आले आहे असे रिचर्डसन यांनी सांगितले.