शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी

By admin | Updated: October 2, 2016 18:05 IST

न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले

ऑनलाइन लोकमत कोलकाता, दि. २ : कोलकाता कसोटीच्या तिस-या दिवसअखेर भारताकडे 339 धावांची भक्कम आघाडी असून अजूनही भारताचे 2 फलंदाज बाकी आहेत.  पहिल्या डावातील अर्धशतकवीर वृद्दीमान साहा(39) अवघड परिस्थितीतही मैदानावर तग धरून आहे. त्याच्यासोबत भुवनेश्वर कुमार 8 धावांवर नाबाद आहे. भारताच्या 8 बाद 227 धावा झाल्या आहेत. त्यापुर्वी रोहीत शर्माच्या जिगरबाज अर्धशतकाच्या जोरावर भारताने समाधानकारक धावसंख्या उभारली.  न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर भारताची(82) आघाडीची आणि मधली फळी तंबूत परतली. विराट, रहाणे, धवन पुजारासारके खंदे फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे सामन्यात मोठा उलटफेर झाल्याचे पाहायला मिळाले. उपाहारापर्यंत भारताने सांभाळून खेळ केला मात्र उपाहारानंतर किवी गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारताचे आघाडीचे फलंदाज बाद झाल्याने भारतीय संघ अडचणीत आला आहे. विजयने ७, धवनने १७ तर पुजाराने ४ धावा केल्या. तर रहाणे अवघी १ धाव करुन माघारी परतला. तिसऱ्या दिवशी खेळपट्टीने अचानकच रंग बदलल्याचे पाहायला मिळाले. चेंडू कधी अचानक उसळी घेत आहे तर कधी प्रमाणापेक्षा खाली राहत आहे. त्यामुळे फलंदाजांना खास अडचणी येत आहेत. या बिकट परिस्थितीतही विराट कोहलीने (४६) रोहित शर्माच्या साथीने डाव सावरण्याचा संघर्षपूर्ण प्रयत्न केला. मात्र, खाली राहिलेल्या चेंडूवर विराट बाद झाल्याने ९१ धावांतच भारताचा निम्मा संघ आता तंबूत परतला. न्यूझीलंडचा कर्णधार रॉस टेलरनेही खेळपट्टीचा रंग बघून जास्तीत जास्त वेगवान गोलंदाजांकडून गोलंदाजी करवून घेत आहे. किवी संघाकडून मॅट हेन्रीने ३ तर ट्रेंट बोल्ट याने २ गडी बाद केले आहेत.दरम्यान, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात भक्कम आघाडी घेतली आहे. भुवी आणि महंमद शमीच्याच्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. भारताक पहिल्या डावात ११२ धावांची आघाडी घेत दुसऱ्या कसोटी सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ५, महंमद शमीने ३ तर जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्या वेळी बीजे वॉटलिंगला (१२) जीतेन पटेल (०५) साथ खेळत होते. बीजे वॉटलिंगला २५ धावावर शमीने बाद केले तर पटेलचा अडथळा अश्विनने दूर केला. शमीने न्युझीलंडचे शेपूट गुंडाळत भारताला ११२ धावांची आघाडी मिळवून दिली. न्युझीलंडतर्फे हेन्री तीन तर बोल्ट, वॅगनर व पटेलने प्रत्येकी दोन तर सँटनरने एक बळी टिपला.भारताने आपल्या घरच्या 250 व्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा पहिला डाव ३१६ धावांत संपुष्टात आला. पुजारा (८७) आणि रहाने (७७) आणि रिद्धिमान साहा (५४) यांनी अर्धशतकी खेळी केली.