शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीपा मलिक यांच्या रौप्यपदकाने नगरमध्ये जल्लोष

By admin | Updated: September 14, 2016 05:08 IST

रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला.

सुदाम देशमुख/अनिल साठे , अहमदनगररिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणाऱ्या दीपा मलिक यांच्या कामगिरीमुळे त्यांच्या भिंगार येथील राहत्या घरी जल्लोष झाला. सोशल मीडियावरूनही मलिक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला आहे. मलिक यांच्या कामगिरीमुळे अहमदनगरचे नाव पुन्हा एकदा क्रीडाविश्वात झळकल्याने नगरमध्ये चैतन्य संचारले आहे.पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविणाऱ्या मलिक या भारताच्या पहिल्या महिला ठरल्या असून, त्या अहमदनगरच्या रहिवासी असल्याचा आनंद नगरिकांना झाला आहे. दीपा मलिक यांचे वडील बिक्रमसिंह हे नगर येथील मिलिटरीमध्ये होते. निवृत्त झाल्यानंतर ते भिंगारला स्थायिक झाले. मलिक यांना बालपणापासूनच खेळाची आवड आहे. त्यांना हे पदक मिळाल्याचे समजताच नगर, छावणी मंडळ परिसरात एकच जल्लोष सुरू झाला. सासर व माहेरची मंडळी देशसेवेतदीपा यांचे वडील बालकिशन नागपाल व सासरे मे.जन. बी. एस. मलिक यांनी लष्करात देशसेवा केली आहे. अन्य नातेवाईक लष्करात मोठ्या हुद्द्यावर आहेत. सर्वांची प्रेरणा व दीपा यांची जिद्द, कोच बाबर यांचे मार्गदर्शन मिळाल्याने त्या पदकापर्यंत पोहोचू शकल्या आहेत. सूनबाईने देशाच्या लौकिकास साजेसा खेळ केला आहे, याचा अभिमान वाटतो.- सत्या मलिक, दीपा मलिक यांच्या सासूअपंग खेळाडूंना प्रशिक्षण देताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. लष्करातील विविध स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. सौंदर्य स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले आहे. अशी खेळाडू माझी शिष्या असल्याचा मोठा अभिमान आहे. रिओ पॅरालिम्पिकमध्ये गोळाफेकमध्ये रौप्यपदक मिळवल्याने आनंद झाला आहे. भारतामध्ये दाखल झाल्यावर नगर शहरात मोठे जंगी स्वागत करून सत्कार करणार आहे. - रावसाहेब बाबर, प्रशिक्षक अपंगत्व तरीही जिद्द...मूळच्या राजस्थानच्या रहिवासी असलेल्या दीपा मलिक यांना शालेय जीवनात बास्केटबॉलची विशेष रुची होती. शालेय जीवनात सुरू झालेली पदकांची लयलूट अपंगत्व येऊनही तशीच सुरू ठेवत पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू म्हणून त्यांनी मान मिळविला आहे. अहमदनगर जवळील भिंगारमधील वैद्य कॉलनीमध्ये त्यांचे निवासस्थान आहे. बाळंतपणात पाठीला आलेल्या ट्युमरच्या आजारात तीन वेळा शस्रक्रिया झाली. त्यात चुकीच्या औषधोपचारामुळे कमरेपासून खालील भागाच्या संवेदना गेल्या होत्या. याच दरम्यान त्यांचे पती कर्नल विक्रांत मलिक हे लष्करात होते. कारगिल युद्धात ते कर्तव्य करीत होते. दीपा यांची माहिती मिळताच युद्धानंतर वरिष्ठांनी त्यांना रजा मंजूर केली होती. मलिक यांचे खचलेले धैर्य पाहून त्यांनी नव्या उमेदीने सराव करण्यास प्रोत्साहन दिले. पत्नीला आलेले अपंगत्व व खेळाची आवड पाहून विक्रांत यांनी लष्कर सेवेचा राजीनामा दिला होता. २००५ साली त्यांनी गोळाफेक सरावाला सुरुवात केली होती. त्यांना प्रशिक्षक रावसाहेब बाबर यांचे मार्गदर्शन लाभले. भालाफेकमध्ये त्यांनी आशियाई स्पर्धेत कांस्य, तर विश्व चॅम्पियन स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती, तर भारत सरकारच्या वतीने दिल्या जाणाऱ्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.