शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चोकर्स पुन्हा बनले जोकर!!!

By admin | Updated: June 12, 2017 04:14 IST

महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला.

बाळकृष्ण परब/ऑनलाइन लोकमतचांगली सवय लागायला वेळ लागतो, पण वाईट खोडी मात्र सुटता सुटत नाहीत. काहीशी अशीच अवस्था झाली आहे ती दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाची. महत्त्वाच्या लढतीत ढेपाळण्याच्या वृत्तीमुळे चोकर्सचा शिक्का बसलेला हा संघ आज पुन्हा आपल्या नावाला जागला. त्याचाच फायदा उठवत विराट कोहलीच्या भारतीय संघाने अगदी करो वा मरो अशी स्थिती असलेल्या लढतीत या चोकर्सना पुन्हा एकदा जोकर बनवले.श्रीलंकेकडून मार खाल्ल्यानंतर भारतासाठी ही लढत काहीशी कठीण मानली जात होती. त्याला कारणही तसेच होते म्हणा, एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला दक्षिण आफ्रिकचा संघ भारतीय संघापेक्षा कांकणभर सरस भासत होता. त्यामुळे ते भारतीय संघाची विकेट तर काढणार नाहीत ना? अशी भीती भारतीय क्रिकेटप्रेमींना राहून राहून वाटत होती. पण प्रत्यक्षात शत्रूला बलाढ्य समजून मोठ्या तयारीनिशी मोहिमेवर जावे आणि शत्रूने पहिल्या प्रहराच हार मानून पांढरे निशाण फडकवावे, तसे पांढरे निशाण दक्षिण आफ्रिकेने विराटसेनेसमोर फडकवले.

आणखी वाचा : एका ट्रॉफीचा पुनर्जन्म!

तसे ते महत्त्वाच्या लढतीत कोलमडण्यासाठी कुप्रसिद्ध आहेतच. त्यांच्या या दुर्गुणाचा आपणही अनेकदा फायदा उचललाय. आजही तेच केले. नाणेफेकीचा कौल आपल्यासाठी शुभशकून ठरला. मग आपली गोलंदाजी पुन्हा बहरली. सलामीलाच पाकिस्तानचे शिरकाण केल्यानंतर लंकेविरुद्ध मात्र गोलंदाज मंडळी थंडावल्यासारखी वाटली. पण आफ्रिकेविरुद्ध मात्र गोलंदाजीत पुन्हा आग दिसली. कमाल म्हणजे आज आपले क्षेत्ररक्षण जबरदस्त झाले. एवढे जबरदस्त की समोरचे आफ्रिकन फलंदाज गोंधळले. अगदी अमला, डीकॉक, डीव्हिलियर्स, मिलर, दुमिनी, मॉरिस असे फर्डे फटकेबाज दिमतीला असतानाही. आपल्या गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी कामगिरी चोख बजावली. त्यांच्या चक्रव्यूहात आफ्रिकी फलंदाज अलगद अडकले, अडखळले आणि भांबावलेल्या अवस्थेत बाद झाले.

आणखी वाचा - "धवन"ने गाठले नवे "शिखर", सचिनचा तोडला रेकॉर्ड

बाकी 192 ही काय आपल्यासाठी अवघड बाब नव्हती. गोलंदाजांनी आधीच बुरुजांना सुरुंग लावल्याने फार हानी न होता आफ्रिकन किल्यावर निशाण फडकवण्याचे काम फलंदाजांवर होते. धवन आणि कोहलीने ते अगदी आरामात पार पाडले. आता उपांत्य फेरीत आपली गाठ बांगलादेशशी पडण्याची शक्यता आहे. स्पर्धेत काहीशा नशिबवान ठरलेल्या बांगलादेशपेक्षा विराटसेना नक्कीच उजवी आहे. पण आपल्याला गाफील राहणे परवडणार नाही.