शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
3
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
4
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
5
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
6
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
7
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
8
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
9
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
10
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
11
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
12
Mangal Gochar 2026: ११ मे ते २१ जून 'या' तीन राशींसाठी सुवर्णकाळ; मंगळ देणार प्रगतीची मोठी संधी!
13
अरे देवा! मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी आई-वडिलांनी ६५ हजार देऊन ठेवले ४ बाऊन्सर
14
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
15
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
16
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
17
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
18
८ महिन्याची गर्भवती, घरोघरी जात केला प्रचार; चक्कर येऊन पडली तरी हिंमत हरली नाही; आज बनली आमदार
19
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
20
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी, ४ विकेट्सने केली मात

By admin | Updated: January 18, 2015 17:37 IST

तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला.

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. १८ - तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले २६८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांमध्ये गाठले असून सलामीवीर अॅरोन फिंचच्या ९६ धावांच्या खेळीने कांगारुनी भारतावर विजय मिळवला.

भारताचे २६८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात चांगली झाली. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर या जो़डीने अर्धशतकी सलामी करुन दिली. उमेश यादवने वॉर्नर २४ धावांवर असताना त्याला बाद केले.  फिंचने शेन वॉटसनसोबत संघाला शंभरी गाठून दिली. संघाच्या ११५ धावांवर असताना वॉटसन (४१ धावा) बाद झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारताचा मारा निष्प्रभ ठरत होता. ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत दोनशेचा पल्लाही ओलांडला होता.  स्टीव्ह स्मिथ ४७ धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याला बाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर अ‍ॅरोन फिंचही ९६ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २१९ अशी झाली. आर. अश्विनने जॉर्ज बेलीला स्वस्तात माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद २३० अशी केली. लागोपाठ तीन विकेट गेल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. ग्लेन मॅक्सवेल २० धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया ६ बाद २४८ अशा अवस्थेत होता. कांगारुंना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १७ चेंडूत २० धावांची गरज होती. अक्षर पटेलने अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले. १२ चेंडूत १५ धावा अशा रोमहर्षक स्थितीत सामना पोहोचला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या ४९ व्या षटकात जेम्स फॉल्कनर आणि ब्रॅ़ड हॅडीन यांनी एकाच षटकात १५ धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात सहा विकेट घेणारा मिशेल स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. शिखर धवन २ धावा, अजिंक्य रहाणे १२ आणि विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सुरेश रैनाच्या साथीने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मिशेल स्टार्कने सुरैश रैनाला बाद करत ही जोडी फोडली. सुरेश रैना ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधाऱ महेंद्रसिंग धोनीने सावध खेळी करत ३१ धावांमध्ये १९ धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला व स्टार्कने त्याची विकेट घेतली. अक्षर पटेलही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २३७ अशी झाली. अखेरीस रोहित शर्माने आर. अश्विनच्या मदतीने भारताला २५० चा पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा १३८ धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सहावे शतक ठोकून पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तर भूवनेश्वर कुमारही भोपळा न फोडता माघारी परतला. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले आणि ५० षटकांत भारताने आठ गडी गमावत २६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिशेल स्टार्कने १० षटकांत ४३ धावा देऊन भारताच्या सहा विकेट घेतल्या. तर गुरिंदर संधू आणि जेम्स फॉल्कनरने प्रत्येकी एक विकेट घेतली.