शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

रेल्वे प्रबंधकाच्या कार्यालयातून पाणीचोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 1:47 AM

सानपाडा स्थानकातील प्रकार : व्यावसायिकांसाठी रात्री उशिरापर्यंत कार्यालय खुले

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : सानपाडा रेल्वे स्थानकातील स्टेशन प्रबंधकाच्या कार्यालयातून पाण्याची चोरी होताना दिसून येत आहे. हे पाणी लगतच्या व्यावसायिकांना पुरवले जात आहे. त्याकरिता रात्री उशिरापर्यंत कार्यालय खुले ठेवले जात असल्याने त्यामागे अर्थकारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सानपाडा रेल्वेस्थानकाच्या इमारतीमध्ये व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांच्या मार्गावरच त्यांचे साहित्य मांडले जात असून अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांनीही मोकळी जागा बळकावली आहे. अशातच काही व्यावसायिकांना स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयातूनच पाणी पुरवले जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्याकरिता रात्री उशिरापर्यंत स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय खुले ठेवले जात आहे. सानपाडा रेल्वे स्थानकाच्या ठाणे-बेलापूर मार्गाकडील बाजूच्या तिकीट खिडकीला लागूनच स्टेशन प्रबंधकांचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेरच व्यावसायिकांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येत आहे.त्यापैकी एका ज्युस सेंटरचालकाला स्टेशन प्रबंधक कार्यालयच आंदण दिल्याचे दिसून येत आहे. त्या ठिकाणी बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाकारणे आवश्यक असतानाही रात्री उशिरापर्यंत केवळ त्यांच्यासाठी कार्यालय खुले ठेवले जात असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे रात्री उशिरापर्यंत तिथल्या स्टेशन प्रबंधकांच्या कार्यालयात खासगी व्यक्तींची ये-जा सुरू असते. यामध्ये एखादे गुन्हेगारी कृत्यही त्या ठिकाणी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात काही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारही केली आहे; परंतु सानपाडा स्थानकातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. यामुळे व्यावसायिकांना पाणी पुरवण्यामागे अर्थकारण असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर संपूर्ण प्रकरणावरून रेल्वेच्या अधिकाºयांकडूनच स्थानकामध्ये फेरीवाले व अवैध व्यावसायिक यांना खतपाणी मिळत असल्याचेदिसून येत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईWaterपाणी