07 May, 26 11:27 AM
राज्यसभेत सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा; येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाणार?
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आता खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय असून, घेतला त्यांच्या जागी कोण, याची पक्षात चर्चा असताना नाशिकमध्ये मात्र अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची चर्चा सुरू आहे. असे झाल्यास येवला मतदारसंघाची सुत्रे सांभाळण्याची माजी खासदार समीर भुजबळ यांची तयारी असून, त्यामुळेच गेल्या वर्षभरापासून ते या मतदारसंघात तळ ठोकून असल्याचे दिसते आहे.
सविस्तर वाचा
07 May, 26 11:21 AM
तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी
तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
07 May, 26 10:16 AM
ममता बॅनर्जींनी घेतली बैठक, दहा आमदार गैरहजर
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला दहा आमदार गैरहजर होते. तृणमूल काँग्रेसचे ८० आमदार निवडून आले आहेत. मात्र बैठकीला ७० आमदाराच उपस्थित होते. ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट निवासस्थानी ही बैठक झाली.
07 May, 26 10:14 AM
वंदे मातरम गीताला राष्टगीताचा दर्जा देणार; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणा गीत असलेल्या वंदे मातरम या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केंद्रीय मंत्रिमंडळाने कायद्यात दुरुस्ती करण्यास मंजुरी दिली आहे. घटनादुरुस्तीनंतर घटनेच्या अनुच्छेद ३ अंतर्गत वंदे मातरम गीताला राष्ट्रगीताप्रमाणेच संरक्षण प्राप्त होईल.
07 May, 26 09:49 AM
तामिळनाडूत AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट हॉटेल मुक्कामी
तामिळनाडूत निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात विजय यांच्या टीव्हीके पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सरकार बनवण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तास्थापन करण्यासाठी त्यांना इतरांची गरज भासणार आहे. त्यात विजय यांना पाठिंबा देण्याची AIADMK पक्षातील काही आमदारांनी मागणी करत वेगळी भूमिका घेतली आहे. यातील २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला हॉटेलमध्ये मुक्कामाला गेला आहे.
सविस्तर वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा