शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
2
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
3
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
5
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
6
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
7
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
8
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
9
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
10
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
11
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
12
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
13
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
14
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
15
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
16
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
17
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
18
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
19
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
20
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित

अनधिकृत बांधकामामुळे पेशवेकालीन गोवर्धनी मातेच्या मंदिराला धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 4:00 PM

सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले.

नवी मुंबई : बेलापूर किल्ले गावठाण येथे पेशवेकालीन आई गोवर्धनी मातेचे मंदिर आहे या मंदिरात बाराही महिने नवी मुंबई, ठाणे, रायगड, भिवंडी, पालघर अशा विविध जिल्ह्यामधून भाविक भक्त दर्शनला येत असतात. तसेच नवरात्रोत्सवात या मंदिरात नऊ दिवस मोठे उत्सव साजरे केले जातात. परंतु मंदिराच्या पायथ्याशी काही काळात विकासकांनी अनधिकृत बांधकाम केल्याने त्या इमारतींच्या खोदकामात प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्यामुळे विकासकांनी कुठल्याही प्रकारची संरक्षण भिंत न बांधल्यामुळे मंदिराच्या पायथ्यापासून व मंदिराच्या मुख्य दरवाजा पर्यंतचा काही मातीचा भाग पावसामुळे ढासळला आहे. त्यामुळे मंदिराच्या पायऱ्या व मंदिराच्या दरवाजाचा मुख्य भाग पडून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही व सदर कुठल्याही प्रकारचा मंदिराला धोका निर्माण झाल्यास व दुर्घटना घडल्यास याला विकासक हा सर्वस्वी जबाबदार राहील, असे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी शनिवारी आपत्कालीन आढावा बैठकीत सांगितले.

महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री ठाणे जिल्हा शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षेतेखाली अतिवृष्ट, महापुराचे नियोजन व उपाययोजना करण्याबाबत आढावा बैठक शनिवारी ठाणे येथील जिल्हाधिकारी नियोजन भवन येथे  झाली. त्यात त्यांनी ही माहिती दिली. यावेळी, म्हात्रे यांनी सांगितले की, प्रथमतः नवी मुंबईत सिडको, नवी मुंबई महानगरपालिका व एमआयडीसी अशी तीन प्राधिकरणे असल्यामुळे प्रामुख्याने एमआयडीसी भाग हा पूर्णतः दगडखाणीने व्यापले असून तिथे डोंगरांच्या खालील भाग संपूर्ण झोपडपट्टीने भरलेले असल्यामुळे तिथे नेहमी पावसळ्यात दिवसा व रात्री दुर्घटना होत असतात. तसेच त्या ठिकाणी आपत्कालीन यंत्रणा व उपायोजना उपलब्ध करून देण्यात याव्या व विशेषतः त्या ठिकाणी रात्री पोलिसांची गस्त वाढविण्यात यावी व पालिकेच्या मार्फत सदर ठिकाणी आपत्कालीन चौकी किंवा तात्पुरत्या स्वरुपात कार्यालय उभारले तर त्या ठिकाणातील नागरिकांना योग्य ती मदत मिळण्यास सोप होईल.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, नवी मुंबईत धोकादायक इमारतींची संख्या जास्त असल्याने या अति पावसामुळे दुर्घटना होऊ शकते त्यामुळे सदर इमारतीमधील नागरीकांना वेळीच इमारत खाली करण्यास महापालिकेद्वारे नोटीस देण्यात यावी व त्यांची योग्य त्या सर्व सुविधायुक्त ठिकाणी त्यांना स्थलांतर करण्यात यावे. तसेच नवी मुंबईमध्ये संक्रमण शिबीर न राबविल्यामुळे जसे जिमी टॉवर ची दुर्घटना झाली त्यावेळेस आम्ही नागरिकांना नवी मुंबईमध्ये जेवढे भवन आहेत त्यामध्ये भवन आम्ही स्थलांतर केले व त्या इमारतीमधील काही उच्चबृह नागरिक आहेत ते कुठे राहण्यास तयार होत नाही. त्यामुळे अशा काही धोकादायक इमारती आहेत त्या खाली करण्यास नागरिक तयार होत नाही तसेच महापालिकेमार्फत त्यावरील लवकरात लवकर राहण्याची उपायोजना करून सदरच्या धोकादायक इमारती खाली करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.

बैठकीस ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, विभागीय तहसीलदार,  विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, आमदार राजू पाटील, आमदार गीता जैन, आमदार संजय केळकर तसेच संबंधित विभागातील पोलीस आयुक्त, विभागीय महापालिका आयुक्त, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईManda Mhatreमंदा म्हात्रे