शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

#VidhanSabha2019 : अडचणीच्या वेळी साथ सोडणारे पळपुटे; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 5:28 AM

अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही.

नवी मुंबई : अडचणीच्या वेळी केवळ सत्तेसाठी पक्ष सोडून जाणारे पळपुटे आहेत. त्यांना जनता माफ करणार नाही. मागील निवडणुकीत मंदा म्हात्रे जिंकल्या होत्या. नाईक यांना त्यांच्याच चुकीमुळे पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कुठे तरी सुधारणा होईल, असे वाटत होते. मात्र पक्ष बदलून त्यांनी पुन्हा मोठी चूक केली आहे. चुकीला जनता कधीच माफ करीत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गणेश नाईक यांच्या पक्षांतराचा समाचार घेतला. तर दिल्लीश्वरांकडून अपमानास्पद वागणूक मिळूनही तह केला, अशा शब्दांत नाव न घेता त्यांनी उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली.नवी मुंबईतील नेरूळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते.सत्ता नाही म्हणून विकास करता येत नाही. त्यामुळे पक्षांतर केले, ही सबब संधिसाधूपणाची आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यास केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. पक्षांतर करणारे देशाच्या या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्यांच्या बाजूला जाऊन बसत आहेत, ही खेदाची बाब आहे. मुळात विरोधात राहून अधिक विकासकामे करता येतात, असे पवार म्हणाले.>नवी मुंबईचे शिल्पकारनवी मुंबईचे शरद पवार हेच शिल्पकार आहेत. गेल्या पाच वर्षांत नवी मुंबईचा काहीच विकास झाला नाही. अशा परिस्थितीत विकासाच्या वल्गना करीत काही लोक पक्षांतर करीत आहेत, असा टोला आमदार शशिकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांचे नाव न घेता लगावला. नवी मुंबईकरांत आजही स्वाभिमान जिवंत आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष संपत नाही,असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारElectionनिवडणूकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019