शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मनपाचा उपक्रम

By admin | Updated: September 1, 2015 04:43 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविला जाणार आहे.

नवी मुंबई : विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचा बुध्द्यांक वाढावा या दृष्टीने प्रयत्न केला जाणार असून त्यासाठी खास मूल्यांकन केले जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ज्या मुलांची शैक्षणिक पात्रता इतर विद्यार्थ्यांपेक्षा कमकुवत आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. प्रश्नपत्रिका कशी तयार करावी, प्रश्नांची आखणी कशी करावी, प्रश्नांचे स्वरूप,चाचणी परीक्षेची उजळणी कशी करावी या संदर्भात सोमवारी महानगरपालिकेतील पहिली ते आठवीच्या शिक्षक, मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात आाले. २२ जून रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली जाणार आहे. या संकल्पनेनुसार मुलांच्या प्रगतीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही पुढाकार घेतला असून याअंतर्गत तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये सप्टेंबरमध्ये पहिली पायाभूत चाचणी, त्यानंतर प्रथम सत्र आणि मग द्वितीय सत्र अशा तीन चाचण्या घेतल्या जाणार आहेत. या तीनही चाचण्यांमध्ये भाषा आणि गणित या दोन विषयांचा समावेश असणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शुध्दलेखन, निबंधलेखन, तसेच विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी वाढविण्याचे प्रयत्न करण्यासाठी महानगरपालिकेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण जाणवता कामा नये यासाठी शिक्षकांनी आपल्या शिकविण्याच्या पध्दतीत काय बदल केला पाहिजे याबाबतही महानगरपालिका शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांची क्षमता वाढविण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वच शाळांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांची क्षमता जाणून घेतली जाणार असून अभ्यासात कमकुवत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.