शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वारांचे मृत्यूला आमंत्रण

By admin | Updated: November 11, 2015 00:27 IST

पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबईपनवेल, नवी मुंबई, उरण परिसरामध्ये मोटारसायकलस्वारांच्या बेशिस्तीमध्ये वाढ होवू लागली आहे. वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. महामार्गावरून प्रवास करतानाही हेल्मेटचा वापर केला जात नसून पोलिसांनी जानेवारीपासून तब्बल ४३,७१७ जणांवर कारवाई करून ४४ लाख रूपयांचा दंड वसूल केला आहे. पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये सायन - पनवेल महामार्ग, मुंबई - पुणे, गोवा महामार्ग, पनवेल ते जेएनपीटी रोड, ठाणे बेलापूर व पामबीच रोडवर चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. जेएनपीटी वगळता इतर सर्व मार्ग सुस्थितीमध्ये असून चालक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहने चालवितात. यामुळे वारंवार अपघात होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मोटारसायकल चालविताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. परंतु या परिसरातील ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापरच करत नाहीत. दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यासाठी वाहतूक विभाग जनजागृती करत असून हेल्मेट न घालणाऱ्यांवर नियमित कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी गतवर्षी जानेवारी ते आॅक्टोबरअखेर तब्बल ३६४९९ दुचाकीस्वारांवर कारवाई करून तब्बल ३८ लाख २६ हजार रूपये दंड वसूल केला होता. यंदा ४३७१७ वाहनांवर कारवाई केली असून ४४ हजार ९८६ रुपये दंड वसूल केला आहे. रोज जवळपास दीडशे ते दोनशे मोटारसायकलस्वारांवर कारवाई केली जात आहे. पोलीस उपआयुक्त अरविंद साळवे यांनी हेल्मेट न घालणाऱ्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. हेल्मेट हे ओझे नाही. ते सुरक्षा कवच असून प्रत्येकाने त्याचा वापर केलाच पाहिजे. हेल्मेटचा वापर न केल्यामुळे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. यामुळे दुचाकीस्वारांनी कारवाई करण्याची वेळ येवू न देता स्वत:हून दुचाकीचा वापर करावा असे आवाहन केले आहे. दुचाकीस्वारांमध्ये स्टंटबाजीचे प्रमाणही वाढत आहे. पामबीचवर धूमस्टाईल दुचाकी चालविणारांची संख्या वाढत असून त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. १८ वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांच्या हातामध्येही पालक दुचाकी देत आहेत. चालक परवाना नसलेले तरूण दिवसभर शहरात भटकत असून एकाच मोटारसायकलवर तीन ते चार जण प्रवास करून अपघातास आमंत्रण देत आहेत.