शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना बळींचे अर्धशतक; प्रादुर्भाव वाढतच असल्याने नवी मुंबईकर चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 00:39 IST

एपीएमसीत २७ वर्षीय व्यावसायिकाचाही मृत्यू

- नामदेव मोरेनवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. शनिवारी पहाटे एपीएमसीत २७ वर्षांच्या तरुण व्यावसायिकाचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या तरुण व्यावसायिकास कोरोनाची लागण झाली होती. कोपरखैरणेमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे त्याचे निधन झाले. त्याच्या आजोबांचेही १२ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. दहा दिवसांत घरात दोघांचा मृत्यू झाल्याने एपीएमसीसह शहरात हळहळ व्यक्त होत आहे. व्यापाऱ्याच्या मृत्यूनंतर शहरातील कोरोना बळींचे अर्धशतक पूर्ण झाले.

महापालिका कार्यक्षेत्रात १३ मार्चला पहिला रुग्ण सापडला. वाशीमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या फिलिपाइन्समधील नागरिकाला लागण झाली. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असताना २५ मार्चला त्याचे निधन झाले. शहरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लागण झाली आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत जागा अपुरी पडत असल्याने वारकरी भवन, वाशीतील समाजमंदिर व पनवेलमधील इंडिया बुल्सच्या इमारतीमध्ये रुग्णालय सुरू केले आहे. वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रामध्ये ११०० बेडचे रुग्णालय तयार केले जात आहे. रुग्णसंख्येबरोबरच मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. रुग्णांबरोबर मृत्यूचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

कोरोनाची लागण झालेल्या ज्या रुग्णांना मधुमेह, रक्तदाब व श्वसनाचे आजार आहेत त्यांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. ५० पेक्षा जास्त वय असणाºया नागरिकांचा मृत्यू होण्याचे प्रमाणही जास्त होते; परंतु आता कोणताही आजार नसणाºया २० ते ४० वयोगटातील तरुणांचाही बळी जात आहे. सीवूडमधील डॉक्टरचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. डॉक्टरच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. एपीएमसीमधील जवळपास पाच व्यापाऱ्यांचा व कामगारासह वाहतूकदाराचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. वाशीमध्ये राहणाºया व्यापाºयावर वेळेत उपचार होऊ न शकल्याने मृत्यू झाला होता. नागरिकांनी स्वत:च स्वत:ची काळजी घेतली नाही तर मृत्यूचे तांडव सुरूच राहण्याचीही भीती आहे.

उपचाराअभावी इतर आजारांमुळेही बळी

च्कोरोनाची साथ सुरू झाल्यापासून इतर आजारांमुळेही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सानपाडामध्ये डायलिसिस वेळेत उपलब्ध न झाल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. कोपरखैरणेमध्ये ज्येष्ठ नगरसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.च्शहरातील अनेक रुग्णालय बंद आहेत. हृदयविकार व इतर गंभीर आजार झाल्यास उपचारासाठी कुठे घेऊन जायचे, असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालय व्यवस्थापनांकडून असहकार्य सुरूच राहिले तर कोरोना व्यतिरिक्त आजारांनीही मृत्यू होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

शवागृहात जागा अपुरी

एखाद्या व्यक्तीचा कोणत्याही आजाराने मृत्यू झाला तरी त्याची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. तोपर्यंत मृतदेह पालिकेच्या शवागृहात ठेवावा लागतो. शवागृहात जागा अपुरी पडत असून दाटीवाटीने मृतदेह ठेवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी मृतदेहाची अदलाबदल झाल्याची घटना निदर्शनास आली होती.

एपीएमसीमधील परिस्थिती गंभीर

नवी मुंबईमध्ये एपीएमसीमुळे सर्वाधिक रुग्ण वाढले आहेत. मार्केटमधील व्यापारी, कामगार, वाहतूकदार, सुरक्षारक्षक व इतर घटकांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यामुळे तुर्भे, कोपरखैरणे, नेरुळ, वाशी, घणसोलीमध्येही प्रादुर्भाव वाढला आहे. कांदा-बटाटा व भाजी मार्केटमधील व्यापाºयांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस