शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत पुन्हा एकदा ‘गणेश पर्वा’ला प्रारंभ

By नारायण जाधव | Updated: January 19, 2026 08:56 IST

१९९५ पासून पहिल्यांदाच  पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत

नारायण जाधव

नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पक्ष कोणताही असो, सतत २० वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यावेळी तर १११ पैकी ६५ नगरसेवक निवडून एकहाती सत्ता सोपविली आहे. यापूर्वी सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी नाईकांना इतरांच्या कुबड्यांची गरज भासत होती. कधी काँग्रेस तर कधी अपक्षांची मदत घेऊन आपणच नवी मुंबईचे दादा आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईचे कसे नुकसान केले, हा मुद्दा त्यांनी प्रचारात मांडला. सत्ता पुन्हा हाती दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण हे सर्व थांबवू, असे आश्वासन दिले. ते लोकांना भावले. आता एकहाती सत्ता आल्याने महापालिकाच नव्हे तर सिडकोसह एमआयडीसीत नाईक काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असेल.

एकनाथ शिंदेंविरोधात अचानक आक्रमक पवित्रा का घेतला, हे वनमंत्री नाईकांनी प्रचारात सांगितले होते. पाच वर्षांपासून नवी मुंबईत प्रशासकीय राजवट आहे. त्या आधी नाईक  सत्तेबाहेर असल्याने या महापालिकेवर आधी नगरविकासमंत्री, नंतर मुख्यमंंत्री आणि पुन्हा नगरविकासमंत्री म्हणून शिंदेंनी हुकूमत गाजविली. यातूनच मर्जीतील अधिकारी प्रतिनियुक्तीवर आणून पात्रता नसताना हवा तो पदभार देऊन त्यांच्याकडून पाहिजे तशी कामे करवून घेणे, नको त्या कामांची कंत्राटे काढणे, नगररचना खात्याकडून पाहिजे तसे निर्णय घेऊन बिल्डरांचे चांगभलं करणे, नवी मुंबईचे पाणी इतरांना देणे,  आरक्षित भूखंड सिडको आणि एमआयडीसीकडून विकणे असे आरोपही त्यांनी केले. महापालिकेत भाजपची सत्ता असताना आणि आमदार असतानाही अधिकारी नाईकांना जुमानत नव्हते. यातूनच मग नाईक आणि शिंदेंमधील दरी वाढली.

आता नाईक मंत्री आहेत.  महापालिकेत पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. निर्णयाच्या चाव्या महासभेच्या हाती गेल्या आहेत. यामुळे नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे अथवा आयुक्तांना आता महासभेच्या मंजुरीशिवाय निर्णय घेता येणार नाहीत. निवडणूक प्रचारात नाईक यांनी आक्रमकपणे प्रचार केला. नगरविकास मंत्री या नात्याने शिंदेंनी यूडीसीपीआरमध्ये बिल्डरधार्जिणे बदल केलेे, आयएएस अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली, कोणी दलाली खाल्ली असे बेछूट आरोप केले. 

महापालिकेत सत्ता आल्यास आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून शहरांना भकास करणारे यूडीसीपीआरमध्ये केलेले बिल्डरधार्जिणे बदल थांबवू, प्रशासकीय राजवटीतील निर्णयांचे ऑडिट करण्यासह ईडीमार्फत चौकशी करू असे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होण्याचे संकेत भाजपच्या पहिल्याच विजयी मेळाव्यात मिळाले आहेत. १९९५ पासून पहिल्यांदाच  पालिकेत भाजपची सत्ता आल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाईकांवर खूश आहेत. यूडीसीपीआरबाबत नाईक यांचे म्हणणे खरे असून मी  मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेईन व शहर विकासासाठी त्यात योग्य बदल केले जातील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितल्याने महापालिकेच्या नगररचनाकारांसह इतरांचे धाबे दणाणले आहेत. आगामी काळात नवी मुंबईत ‘भाई’गिरी कमी होऊन ‘दादा’गिरी चालेल असे दिसते.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Ganesh Naik's Power Resurges in Navi Mumbai Municipal Elections

Web Summary : Ganesh Naik regains control in Navi Mumbai after winning the municipal elections. Naik criticized Eknath Shinde's policies, promising to reverse builder-friendly changes. With BJP's support, significant changes in city planning are expected, shifting power dynamics within Navi Mumbai.
टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporation Electionनवी मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Ganesh Naikगणेश नाईकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस