शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोहयो’साठी निधी कमी पडणार नाही

By admin | Updated: March 17, 2017 05:54 IST

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत

अलिबाग : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही. परिणामी, अधिकाधिक कामे नियोजित वेळेत पूर्ण करावीत. कामे घेताना काही निकष अडचणीचे ठरत असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत या निकषात बदल करता येतील, असे निर्देश केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्र ममंत्री अनंत गीते यांनी गुरुवारी येथे बोलताना दिले.केंद्र सरकार पुरस्कृत योजनांतर्गत कामाचा आढावा घेण्यासाठी रायगड जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात गीते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रायगड जिल्ह्यात मनरेगाची ग्रामपंचायत विभागाच्या माध्यमातून ४ हजार ९२ तर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून २ हजार ५९५ अशी एकूण ६ हजार ६८७ कामे प्रस्तावित असून त्यापैकी १४४ कामे जिल्ह्यात प्रत्यक्ष सुरू आहेत. योजनेच्या निकषांमधील काही अडचणींमुळे कामे होऊ शकत नसल्याचे बैठकीत लक्षात आल्यावर गीते यांनी निकष बदलाबाबत निर्देश दिले आहेत. जनकल्याणासाठी केंद्र शासनामार्फत अर्थसाहाय्य असलेल्या अनेक योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून योजना अधिकाधिक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करावे. प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उपयुक्त आहे. या योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांनी भाग घ्यावा. योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सन २०१८ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे नियोजन आहे. यादृष्टीने संबंधित यंत्रणेने काम करावे, असेही गीते यांनी सांगितले.प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत सुरू असलेली कामे मे २०१७ अखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जी कामे अद्याप सुरू नाहीत ती तत्काळ सुरू करावीत, असे त्यांनी सांगून जिल्ह्यात असलेल्या खाड्यांमधून जलप्रवासी वाहतूक करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पंचायत समित्यांचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती, नगराध्यक्ष, समितीचे सदस्य तसेच जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे तसेच जिल्ह्यातील सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी आभार मानले.