शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सागरी सुरक्षेसाठी मच्छीमारांची सतर्कता महत्त्वाची

By admin | Updated: December 12, 2015 01:50 IST

सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले.

नवी मुंबई : सागरी सुरक्षेकरिता पोलिसांप्रमाणेच मच्छीमार बांधवांचीही सतर्कता महत्त्वाची असल्याचे मत पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी व्यक्त केले. सागरी सुरक्षा अभेद्य करण्याच्या उद्देशाने शुक्रवारी वाशी येथे सागर रक्षक दल, ग्रामरक्षक दल व पोलीस मित्र यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम असून प्रत्येक गैरहालचाल फेल करणारी उपाययोजना राबवली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबईला लागूनच असलेल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीत ६० कि.मी.चा समुद्र किनारा व ४४ कि.मी.चा खाडी किनारा लाभलेला आहे. त्यापैकी १२ किनारे हे धोक्याची घंटा असून त्याठिकाणची सुरक्षा सदैव सतर्क ठेवण्यात आलेली आहे.मुंबईवर हल्ला करण्यासाठी नवी मुंबई सागरी किनारा देखील वापरला जावू शकतो. यामुळे दुर्लक्षित असलेल्या जेट्टी व सागरी किनाऱ्यांच्याही सुरक्षेवर नवी मुंबईच्या विशेष शाखा पोलिसांनी भर दिलेला आहे. याकरिता मच्छीमार बांधवांनाही विश्वासात घेतले जात आहे. मासेमारीच्या निमित्ताने समुद्र अथवा खाडीमध्ये वावरत असलेल्या मच्छीमारांच्या निदर्शनास काही संशयास्पद हालचाली येवू शकतात. त्याचे गांभीर्य लक्षात घेवून ही बाब त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवल्यास गुन्हेगारांचा प्रयत्न हाणून पाडला जावू शकतो. याकरिता मच्छीमार बांधव, सागर रक्षक दल व ग्रामरक्षक दल यांचा मेळावा वाशीतील भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी मच्छीमार बांधव हे पोलिसांचे नाक, कान डोळे असल्याचे सांगितले. सागरी सुरक्षा अभेद्य ठेवण्यासाठी पोलीस झटतच असतात. मात्र मच्छीमार बांधवांनी देखील याकामी पोलिसांना साथ दिल्यास कोणताही गैरप्रकार घडण्यापूर्वीच तो टळू शकतो असेही ते म्हणाले. गत महिन्यात विशेष शाखा पोलिसांनी सागर कवच अभियान राबवले होते. यामध्ये चाचणी स्वरूपात तीन सागरी हल्ले घडवण्यात आले. मात्र हे तीनही हल्ले सागरी पोलिसांनी फेल करुन आपली कार्यक्षमता सिध्द केल्याचे विशेष शाखा उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी सांगितले. सदर कार्यक्रमास अप्पर आयुक्त विजय चव्हाण, उपआयुक्त शहाजी उमाप, नौदलाचे अमोल जाधव, तटरक्षक दलाचे अंकित शर्मा, कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)