शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये २१ लाखांची वीजचोरी उघड

By admin | Updated: November 1, 2015 00:18 IST

पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस

नवी मुंबई : पनवेल तालुक्यामधील वीजचोरी थांबविण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. तळोजासह नऊ गावांमध्ये धाड टाकून वीजचोरीच्या २७८ घटना उघडकीस आणल्या आहेत. २१ लाख रुपयांची वीज चोरून वापरली असल्याचे निदर्शनास आले असून, संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. विजेची गळती आटोक्यात आणण्यासाठी आणि वीज देयकाची वसुली वाढविण्याकरीता महावितरणच्या भांडुप नागरी परिमंडळाने वीजचोरीविरोधातील ही मोहीम सुरू केली आहे. पनवेल परिसरामध्ये विजेची गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास येऊ लागले होते. या परिसरात वीजचोरी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी वीजवाहिन्यांवरील वीजगळती कमी करण्यासाठी खास पथक तयार केले आहे. वीजचोरी निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश या पथकाला दिले आहेत. पनवेल एक उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुभाष राठोड यांनी १६, १९ आणि २० आॅक्टोंबरला तळोजा, नावडा, देवीचा पाडा, चिंचवली, शिरवली भोदर, उत्तरपाडासह एकूण नऊ गावांमध्ये धाडी टाकल्या. या परिसरात २७८ जणांनी वीजचोरी केली असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी तब्बल १ लाख ५५ हजार ५८१ युनिट चोरून वापरले असून, त्याची किंमत २१ लाख रुपये होत आहे. या परिसरात झालेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. वीज कायदा २००३ च्या अधीन राहून वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांना चोरी केलेल्या युनिटची व दंडाच्या रकमेची वीजदेयके वितरीत करण्यात आली आहेत. आतापर्यंत १८ ग्राहकांनी ३ लाख रुपयांची रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. वीजदेयके नाकारणाऱ्या ४० ग्राहकांवरही वीज कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. वीजचोरी करणे हा दंडनीय अपराध आहे. या गुन्ह्यांत संबंधितांना कारावासाचीही शिक्षा होऊ शकते. वीजचोरीमुळे शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध होत नाही. भारनियमन मुक्तीच्या वाटेतील हा मोठा अडसर असल्याचे मुख्य अभियंता सतीश करपे यांनी सांगितले आहे. वीजचोरी करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)महावितरणने मागेल त्याला रीतसर वीजपुरवठा देण्याचे धोरण आखले आहे. नागरिकांनी रीतसर वीजजोडणी घ्यावी. कोणीही वीजचोरी केली तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. वीजचोरीविरोधातील मोहीम सुरूच राहणार असल्यामुळे वीजचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.