शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही पाण्याची उधळपट्टी सुरू

By admin | Updated: September 23, 2015 04:23 IST

गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडला असल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहिम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे.

प्राची सोनवणे, नवी मुंबईगतवर्षीच्या तुलनेमध्ये पाऊस कमी पडला असल्यामुळे राज्यभर दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणी वाचवा मोहिम सुरू असताना नवी मुंबई व पनवेल परिसरात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. पाणी गळती, चोरी व पिण्याच्या पाण्याचा वाहने धुणे व उद्यानासाठीही वापर केला जात आहे. नवी मुंबईकरांचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी महापालिकेने मोरबे धरण विकत घेतले आहे. यामुळे शहरवासीयांना २४ तास पाणीपुरविणे शक्य झाले आहे. २०१२ च्या भीषण दुष्काळात राज्यातील सर्व शहरांमध्ये पाणीकपात सुरू असताना नवी मुंबईमध्ये मात्र मुबलक पाणीपुरवठा करण्यात येत होता. सद्यस्थितीमध्ये ३६० एमएलडी पाणी धरातून घेतले जात आहे. सद्यस्थितीमध्ये पाणी साठा समाधानकारक असला तरी गतवर्षी २२ सप्टेंबरला मोरबे परिसरात तब्बल २०३५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी फक्त १५५० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीपेक्षा तब्बल ४८५मिलीमिटर पाऊस कमी आहे. सद्यस्थितीमध्ये धरणातील पाणीसाठा मार्चपर्यंतच पुरू शकतो. यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. परंतू शहरवासी पाण्याची प्रचंड उधळपट्टी करत आहेत. अनेक सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या ओसांडून वाहत असतात. पाईपलाईनने वाहने व झाडांना पाणी घातले जात आहे. झोपडपट्टीमध्ये सार्वजनीक नळ सुरूच ठेवला जात आहे. पालिकेच्या उद्यान व दुभाजकांमधील वृक्षांनाही नळाने पाणी घातले जात असून अनेक उद्यानांना तलावाचे स्वरूप येवू लागले आहे. पाण्याच्या उधळपट्टीविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. महापालिका क्षेत्रात १९ टक्के पाणीगळती आहे. यामध्ये पाणी चोरीचाही समावेश आहे. काही हॉटेल व इतर व्यवसायिक चोरून पाणी वापर असल्याचे बोलले जात आहे. पाण्याचा होणारा गैरवापर, पाणीचोरी, या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कडक भुमिका घेण्यास सुरूवात केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पथक तयार केलले आहे. आतापर्यंत ४ हजार पेक्षा जास्त नागरिकांना नोटीस पाठविल्या आहेत. या सर्वांना पाण्याची उधळपट्टी केल्यास कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरातील हीच स्थिती आहे. पाईपलाईनला छिद्र पाडून पाण्याची चोरी सुरू आहे. पाण्याची गळती थांबविण्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. पाणी चोरी करणारांवरही काहीच कारवाई होत नाही. नवी मुंबई महापालिकेने सोशल मीडिया, भित्तीपत्रके, शाळेतील शिबिर घेऊन पाणीबचतीविषयी जनजागृती सुरू केली आहे. पाण्याची उधळपट्टी करणारांना नोटीस पाठविण्यास सुरुवात केली आहे. परंतु पनवेल तालुक्यात मात्र फारशी जनजागृती केली जात नाही. खारघर ते कळंबोलीपर्यंतच्या सिडको नोडमध्येही सिडको प्रशासनाकडून जनजागृती केली जात नाही. पाण्याची उधळपट्टी करणारांवर काहीच कारवाई होत नसल्यामुळे दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.पनवेल परिसरामध्ये जीवन प्राधिकारणाच्या पाइपलाइनला अनेक ठिकाणी छिद्रे पाडण्यात आली आहेत. झोपडपट्टी व इतर ठिकाणचे नागरिक या पाण्याचा उपयोग करीत आहेत. २४ तास पाणी सुरू असल्यामुळे रोज हजारो लीटर पाणी गटारामध्ये जात आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारे गळती व त्यामधून पाणी चोरी सुरू आहे. परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. जलबचतीसाठी शहरामध्ये जनजागृतीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत शाळा, महाविद्यालये तसेच शहरातील सर्वच महत्त्वाच्या परिसरांध्ये जनजागृती केली जात आहे. पाणी चोरी आणि गळती या समस्यांचे निराकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पुरेपूर प्रयत्न केले जातात. अनधिकृतपणे पाण्याची चोरी करणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई केली जात असून, आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे.- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा)