शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांचे लोंढे मुंबईत

By admin | Updated: September 5, 2015 02:02 IST

राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भयाण स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीही झालेली नाही.

प्राची सोनावणे, नवी मुंबईराज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळाची भयाण स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अद्याप पेरणीही झालेली नाही. ना प्यायला पाणी, ना हाताला काम, त्यामुळे शेकडो दुष्काळग्रस्त मुंबई, नवी मुंबईत येऊ लागले आहेत. मिळेल ते काम करून उड्डाणपुलाखाली व जागा मिळेल तिथे मुक्काम आपला उदरनिर्वाह करत आहेत. येथेही त्यांची उपासमार मात्र टळलेली नाही. राज्यात २०१२मध्ये पडलेल्या भीषण दुष्काळापेक्षा गंभीर स्थिती या वर्षी निर्माण झाली आहे. जगायचे कसे असा प्रश्न पडलेली शकडो कुटुंबे रोजगाराच्या शोधात मुंबई, नवी मुंबईमध्ये येऊ लागली आहेत. जालना, नांदेड, उस्मानाबाद, हिंगोली व इतर जिल्ह्यांतील जवळपास ४०० कुटुंबे नवी मुंबईत आली आहेत. यामधील जवळपास १०० जणांनी तुर्भे उड्डाणपुलाखाली आसरा घेतला आहे. अनेक जण नाकाकामगार म्हणून मिळेल ते काम करीत आहेत. दिवसभर मिळालेल्या पैशावर धान्य विकत घेऊन पुलाखालीच दगडाच्या चुलीवर जेवण बनविले जात आहे. काम करण्याची क्षमता नसलेली कुटुंबातील वयस्कर माणसे रेल्वे स्टेशन व इतर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करीत आहेत. कर्जबाजारी शेतकरी पिकाअभावी त्रस्त झाले असून कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांना पडला आहे. 400 संसार रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी वृद्ध आई-वडील, लहान मुलांना गावी ठेवले असून, काम मिळविण्यासाठी येथे आले आहेत. गावाकडील माणसांसाठी जीव तुटत असल्याचे सांगताना त्यांच्या अश्रूंना वाट मोकळी झाली...गावाकडे रोजगाराचे साधन नसल्यामुळे मुंबईत आलो आहे. कामासाठी नाक्यावर उभे राहावे लागते. कधी काम मिळते तर कधी मिळत नाही. कित्येक वेळा काम न मिळाल्यामुळे उपाशीच झोपावे लागते. - किसन माळी, शेतकरी जालना