शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

Coronavirus : खारघरच्या ग्रामविकास भवनातील कक्षात दीडशे खाटांची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 2:06 AM

महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पनवेल - पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून खारघर शहरातील ग्रामविकास भवनात कोरोना संशयित अथवा विदेशवारी करून आलेल्या नागरिकांसाठी विलगीकरण केंद्र स्थापन करण्यात आला असून दीडशे खाटांची सुविधा करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात विदेशवारी करून आलेल्या नागरिकांना १४ दिवस या ठिकाणी निगराणीत ठेवले जाणार असल्याची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.पनवेलमधील नागरिक शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती पालिकेला मिळाली होती. त्यानुसार महापालिकेचे पथक रात्री अडीचच्या सुमारास विमानतळावर दाखल झाले. या वेळी पथकाने एका बसच्या साहाय्याने १६ जणांना पनवेलमध्ये आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यापैकी ९ जण पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत. टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी हे खेळाडू पनवेलमधून दुबईला गेले होते. उर्वरित ७ जण राज्यातील विविध भागांतील असल्याने त्यांना त्या ठिकाणी रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत.पुढील आदेश मिळेपर्यंत सर्व शासकीय व साप्ताहिक सुट्ट्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत. रविवारी चारही प्रभाग अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यलय, खासगी शाळा, महाविद्यालये, निमशासकीय संस्था, अंगणवाड्या, बालवाड्या बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिकाºयांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन होत आहे की नाही याबाबत निश्चित ठिकाणांना भेट देण्याचे आदेश आयुक्त देशमुख यांनी दिले आहेत.उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या काही नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी अशा नागरिकांना पालिकेच्या पथकाने शोधून काढले. त्यांना खारघर येथील ग्रामविकास भवनात ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मागील तीन दिवसांत सुमारे ३0 ते ४0 जण दुबईवरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई