शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : एपीएमसीत २० तास स्वच्छता मोहीम,भाजीसह फळ मार्केट स्वच्छतेसाठी बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 04:24 IST

सलग २० तास स्वच्छतेचे काम सुरू होते. कचरा उचलून पॅसेज धुण्यात आले. कीटकनाशक औषधे फवारून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी व फळ मार्केट विशेष स्वच्छतेसाठी गुरुवारी बंद ठेवण्यात आले. सलग २० तास स्वच्छतेचे काम सुरू होते. कचरा उचलून पॅसेज धुण्यात आले. कीटकनाशक औषधे फवारून संपूर्ण मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच एवढ्या प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती.नवी मुंबईमध्ये ७२ हेक्टर जमिनीवर बाजार समितीने पाच मार्केट उभारली आहेत. मार्केटमधून प्रतिदिन ५० ते ६० टन कचरा निर्माण होत असतो. यामधील ८० टक्के कचरा भाजी व फळ मार्केटमध्ये तयार होत असतो. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजार समिती प्रशासनाने पाचही मार्केटमध्ये उपाययोजना सुरू केल्या असून भाजी व फळ मार्केट गुरुवारी व रविवारी पूर्णपणे बंद करून निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बुधवारी रात्री दहा वाजल्यापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. मार्केटमधील ट्रक, टेम्पो व इतर वाहने बाहेर काढण्यात आली. पहाटेपर्यंत सर्व कचरा साफ करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. कचरा साफ केल्यानंतर रस्ते व दोन्ही गाळ्यांच्या मधील पॅसेज पाण्याने धुऊन घेण्यात आला. पाणी मारून धूळही साफ करण्यात आली. मार्केट धुतल्यानंतर रस्ते, गटार व गाळ्यांच्या परिसरामध्ये औषध फवारणी करण्यात आली. ज्या ठिकाणी ओला कचरा साठतो त्या ठिकाणी कीटकनाशक पावडर टाकण्यात आले. मार्केटमध्ये डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठीही धुरीकरण व औषधांची फवारणी करण्यात आली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जवळपास २० तास ही मोहीम सुरू होती.बाजार समितीचे भाजीपाला व फळ मार्केट १९९६ मध्ये स्थलांतर करण्यात आले. मार्केटच्या साफसफाईसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली असून नियमित कचरा उचलण्यात येतो. परंतु २४ वर्षांमध्ये प्रथमच विशेष स्वच्छता मोहीम राबवून मार्केट धुऊन घेण्यात आले आहे. कचरामुक्त मार्केट करून औषध फवारणी करण्यात आली. यामुळे व्यापाऱ्यांनीही समाधान व्यक्त केले आहे. या मोहिमेसाठी मार्केट बंद ठेवण्यासही व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविली होती. मार्केटमधील हॉटेल व इतर स्टॉल्सही बंद ठेवण्यात आले होते. स्वच्छतेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले होते.प्रवेशद्वारावरचस्वच्छतेची सुविधाबाजार समितीच्या प्रत्येक मार्केटमध्ये यापुढे एकच आवक गेट ठेवण्यात येणार आहे. मार्केटमध्ये येणाºया वाहनचालकांना गेटवरच हात धुण्यासाठीची आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली असून मार्केटमध्ये गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.फळ मार्केटमध्ये रात्री दहा वाजल्यापासूनच कचरा उचलण्यास सुरुवात केली. रात्रभर कचरा साफ करून सकाळी पॅसेज धुऊन घेतले. सायंकाळपर्यंत औषध फवारणी करून मार्केटचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. यापुढेही मार्केट नियमित स्वच्छ राहील याकडे लक्ष दिले जाईल.- संजय पानसरे,संचालक फळ मार्केटभाजी मार्केटमध्ये देशभरातून कृषी माल विक्रीसाठी येत असतो. ओला कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत असतो. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी गुरुवारी व रविवारी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. मार्केटमध्ये रात्रीपासून साफसफाई, औषध फवारणी करण्यात आली.- शंकर पिंगळे,संचालक, भाजी मार्केटऔषध फवारणीपहाटेपर्यंत सर्व कचरा साफ करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. कचरा साफ केल्यानंतर रस्ते व दोन्ही गाळ्यांच्या मधील पॅसेज धुऊन घेण्यात आला.पाणी मारून धूळही साफ करण्यात आली. मार्केट धुतल्यानंतर रस्ते, गटार व गाळ्यांच्या परिसरामध्ये औषध फवारणी, किटकनाशक फवारणी करण्यात आली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती