शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
3
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
4
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
5
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
6
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
7
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
8
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
9
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
10
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
11
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
12
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
13
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
14
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
15
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
16
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
17
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
18
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
19
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
20
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये खतकुंड्यांचे कचरा कुंडीत रूपांतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 23:31 IST

पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत.

कळंबोली : पनवेल महापालिकेने स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत ठिकठिकाणी खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. परंतु या खतकुंड्यांचे रूपांतर कचरा कुंड्यात झाले आहे. खतनिर्मितीच्या उद्देशाने बांधण्यात आलेल्या कुंड्यात आता कचरा साठवला जात आहे. त्यामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने फक्त दिखाऊगिरी केली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पनवेल महापालिका क्षेत्रात महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत. त्यामध्ये पनवेल शहर, नवीन पनवेल, छोटा खांदा, मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच महापालिकेतील समाविष्ट २९ गावांमध्ये ८0 पेक्षा जास्त कुंड्या बांधण्यात आल्या आहेत. या कुंड्यात ओला कचरा तसेच पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मिती करण्यात येणार होते. तयार झालेले खत महापालिका क्षेत्रातील उद्यान, झाडांसाठी उपयोग केला जाणार होता. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात खत तयार झाले तर ते विकण्याचेही प्रयोजन महापालिकेने आखले होते. दोन वर्ष झाले तरी बांधलेल्या खतकुंड्यांत कधीच खत निर्माण झाले नाही. स्वच्छ सर्वेक्षणात फक्त दिखाऊगिरी महापालिकेने केली असल्याची चर्चा पनवेलमध्ये रंगत आहे. महापालिका हद्दीतील बऱ्याच खतकुंड्यांत कचरा टाकल्याचे दिसून येत आहे. नागरिक सर्रासपणे या कुंड्यात प्लॅस्टिक, बाटल्या, घरगुती टाकाऊ कचरा, कपडे इतर कचराही यात टाकला जात आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी आत साचल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचे खांदा वसाहतीतील रहिवासी उमेश मालुसरे यांनी लोकमतला सांगितले. महापालिकेने दिखाऊगिरी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप मालुसरे यांनी केला. तसे पाहता महापालिकेने केलेला प्रयोग फसल्याचे पहावयास मिळत आहे. याबाबत सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांना संपर्क केला असता संपर्क होवू शकला नाही.>एका खतकुंडीला 20 हजार केलेला खÞर्च पाण्यात : पनवेल महापालिका क्षेत्रात 80 खतकुंड्या बांधण्यात आल्या होत्या . त्या बांधण्यातरिता एका खतकुंडीस 20 हजार रु पये खÞर्च करण्यात आले होते. लाखों रु पये खÞर्च करु न सुध्दा या कुंड्यांचा वापर कचरा साठवण्यासाठी केला जात आहे. लाखों रु पये पाण्यात गेले आहे. घनकचरा व्यवस्थापन तर झाले नाही . परंतू एक शोभेची वस्तू बनून खतकुंड्या कच-यात पडल्या आहेत.>दोन वर्षे खतकुंड्या कचºयात पडूनदोन वर्षाअगोदर पनवेल महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांच्या संकल्पनेतून या कुंड्या बांधण्याचे काम करण्यात आले होते. शिंदे यांच्या बदलीनंतर महापालिकेने दुर्लक्ष केले. दोन वर्षे झाली तरी या कुंड्यांचा खत बनवण्याकरिता वापर केला नाही. तर कचराकुंडी म्हणूनच वापर केला जात आहे.