शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

योगींचा शिवसेनेवर पलटवार, म्हणाले- महाराष्ट्र सरकारनं 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2020 00:31 IST

लखनौ/मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील ...

ठळक मुद्देशिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक'मधील शिवसेनेच्या भूमिकेनंतर योगींनी पलटवार केला आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंदर्भात एकापाठोपाठ एक ट्विट करण्यात आले आहेत.शिवसेना सरकारकडून केवळ छळच मिळाल्याचेही योगींनी म्हटले आहे.

लखनौ/मुंबई :उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक'मध्ये आपली तुलना हिटलरशी करण्यात आल्यानंतर योगी यांनी हा पलटवार केला आहे. ते म्हणाले, महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊन मजुरांना आश्रय दिला असता तर ते उत्तर प्रदेशात परत आले नसते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या मुद्द्यावर एका पाठोपाठ एक, अनेक ट्विट करण्यात आले आहेत. एका ट्वीटमध्ये संजय राऊतांना टॅग करत म्हणण्यात आले आहे, की 'एक भूकेले मूलच आपल्या आईला शोधते. जर महाराष्ट्र सरकारने 'सावत्र आई' होऊनही आश्रय दिला असता, तर महाराष्ट्राला बळकट करणाऱ्या आमच्या उत्तर प्रदेशातील रहिवाशांना पुन्हा उत्तर प्रदेशात येण्याची गरज भासली नसती.'

CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"

'शिवसेना सरकारकडून केवळ छळच मिळाला' -आणखी एका ट्वीटमध्ये, योगींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यात म्हणण्यात आले आहे, 'आपल्या रक्ताने आणि घामाने महाराष्ट्राला उन्नत बनवणाऱ्या कामगारांना शिवसेना-काँग्रेस सरकारकडून केवळ छळच मिळाला. लॉकडाउनमध्ये त्यांना धोका दिला गेला. त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आणि घरी जाण्यास प्रवृत्त केले. या अमानवीय कृत्यासाठी मानवता उद्धव ठाकरेंना कधीही क्षमा करणार नही.'

CoronaVirus News: कोरोनाविरोधातील युद्धात महाराष्ट्राने 'या' राज्याकडे मागितली मदत; अनुभवी डॉक्टर, नर्स पाठवण्याचे केले आवाह

'काळजीचं नाटक करू नका' -आणखी एका ट्विटमध्ये योगींच्या कार्यालयाने लिहिले आहे, 'अपल्या घरी पोहोचत असलेल्या सर्व बहिण भावांची राज्यात काळजी घेतली जाईल. आपली कर्मभूमी सेडण्यासाठी भाग पाडल्यानंतर त्यांच्या काळजीचे नाटक करू नका. सर्व मजूर  बंधूंना खात्री आहे, की आता त्यांची जन्मभूमी त्यांची कायमच काळजी घेईल. शिवसेना आणि काँग्रेसनेही खात्री ठेवावी.'

CoronaVirus News: संपूर्ण जग वाट बघतय; पण, ऑक्सफर्डच्या वैज्ञानिकानेच अर्धी करून टाकली व्हॅक्सीनची आशा

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथSanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा