शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

ईशान्य भारतात 'नेडा'चा प्रयोग यशस्वी होणार का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 8:35 AM

हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे.

मुंबई - हिंदीभाषक पट्ट्यासह महाराष्ट्र, गुजरात अशा राज्यांमध्ये भाजपाला सत्ता स्थापन करता आली आहे. तसेच दक्षिणेत स्वबळावर कर्नाटकातही भाजपाला एकदा संधी मिळाली आहे. मात्र ईशान्य भारतामध्ये आजवर म्हणावे तसे यश कधीही मिळाले नव्हते. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ओडिशा, केरळ, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतात भाजपाची पाळेमुळे रोवण्यासाठी प्रयत्न करू असे स्पष्ट वक्तव्य केले आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही दिसून येतात.

केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सत्ता आल्यानंतर नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सप्रमाणे नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स २४ मे २०१६ रोजी स्थापन करण्यात आली. या आघाडीमध्ये नागा पिपल्स फ्रंट, सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट, पीपल्स पार्टी ऑफ अरुणचल, आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स पार्टी या भाजपाचे सहकारी पक्ष आहेत. आसाममध्ये एकेकाळी काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असणारे हेमंत बिस्वा शर्मा भाजपामध्ये आल्यानंतर त्यांच्यामदतीने भाजपा आसाममध्ये सत्तेत येण्यास यशस्वी झाला. त्यांच्याकडेच या आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. आसामच्या निवडणुकीनंतर ईशान्य भारतामध्ये भाजपाच्या बाजूने जनमत तयार व्हावे यासाठी राम माधव आणि केंद्रीय मंत्री अल्फोन्स कन्ननथानम हे या प्रदेशात अक्षरशः तळ ठोकून राहिले. या सर्व प्रयत्नांना यश आले तर भाजपासाठी हा आनंदाचा सर्वात मोठा क्षक्ष असेल. 

सध्या या आघाडीचे सिक्किममध्ये पवनकुमार चामलिंग, आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल, अरुणाचल प्रदेशात पेमा खांडू, मणिपूरमध्ये बिरेन सिंग, नागालँडमध्ये टी.आर. झेलियांग हे मुख्यमंत्री आहेत. अरुणाचल प्रदेशात २००३ साली गेगांग अपांग यांनी भाजपाचे अल्पकाळाचे सरकार स्थापन केले होते. आता नागालँडमध्ये पुन्हा भाजपा आणि नागा पिपल्स पार्टी सत्तेत येण्याची शक्यता आहे. तसेच एक्झीट पोलमध्ये मेघालय आणि त्रिपुरा येथे भाजपाची आघाडी सत्तेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्रिपुरामध्ये या एक्झिटपोलनुसार निकाल लागले तर मात्र डाव्यांसाठी तो मोठा धक्का असेल. माणिक सरकार यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. 

 

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह