शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विकली राऊंड..... क्राईम गुन्हेगाराचे वय १८

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खो

जिल्ह्यामध्ये खून, दरोडा,हाणामारी, अत्याचार, अपहरण, घरफोडी, दुचाकी चोर, सायकल चोर असे एकामागून एक गुन्हे घडत आहेत. या गुन्ह्यांमधील काही आरोपी जसे सराईत आहेत, तसेच अनेक आरोपी हे तरुण आहेत. त्यांच्या चेहर्‍याकडे बघितल्यानंतर ते गुन्हेगार असतील, यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. १८ ते २० वर्षांचे आरोपी पाहून अनेकवेळा पोलिसांचेही हृदय हेलावते. त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकताना पोलिस आणि न्यायाधिशांच्याही कठोरतेला पाझर फुटत असणार. ज्या वयात शिक्षण घ्यायचे, त्या वयात तरुण मुले जेलची हवा खात तरुणाई स्वत:च्याच कर्माने चिरडून टाकतात. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात टाकले जाते, मात्र १८ वर्षांच्यावर वय असलेली मुले आपले भविष्य अंधार कोठडीत डांबून ठेवतात. जेथे मिशाही फुटलेल्या नसतात, तिथे गुन्हेगारीच्या अनेक फांद्या पसरट होतात. त्याची मुळेही खोलवर रुजतात. खोड कसे तयार होते, याची अनेक कारणे आहेत. घटस्फोट,आई-वडिलांमध्ये आलेला दुरावा, अनाथ मुलांना न मिळालेला आसरा, व्यसनाधिनता, मुलांकडे पालकांचे दुर्लक्ष, पाचवीला पुजलेले दारिद्रय, कमी कष्टात पैसा मिळविण्याचा हव्यास अशी एक ना अनेक कारणे यामध्ये दडलेली आहेत. गुन्हा घडल्यानंतर अशा भावनिक गोष्टींबाबत कायदा कधीच विचार करीत नसतो. गुन्ह्याप्रमाणे शिक्षा होते. मात्र या तरुणांचे पुढे काय ? याचा समाज फारसा विचार करीत नाही. ट्र्रक चालकांना लुटणारी टोळी, वाळू तस्करी, तरुणांचे खून पाडणारे हे कोणी सराईत गुंड नव्हे, तर साधे-सुधे तरूण आहेत. त्यांच्यामध्ये अशी खुनशी वृत्ती का निर्माण होते? याचा विचार करण्यापूर्वीच ते चतुर्भज होतात. आपला तरुण मुलगा कुठे जातो, काय करतो, कोठून पैसे आणतो, घरातून पैसे न देताही तो चैनीच्या वस्तू, मौज-मजा करतो, हे आपल्या मुलांना विचारण्याचे धाडस पालकांमध्ये नसल्यानेच गुन्हेगारीचे वय १८ च्या आत येऊ लागले आहे. यासाठी प्रबोधनापेक्षाही पालकांचा आणि कायद्याचा धाक हवा आहे. गुन्ह्यांचा तपास वेगाने झाला, शिक्षा एक वर्षाच्या आत लागली तरच कायद्याचा आणि पोलिसांचाही धाक निर्माण होईल. पोलिसांची तपास प्रक्रिया वेळकाढू आणि लांबणारी असेल तर एकामागून एक नवे गुन्हेगार तयार होतील. तरुणांच्या टोळ्यांचा पोलिसांनी आधीच बंदोबस्त केला, तरच गुन्हेगारीच्या जाळ्यात तरुण अडकणार नाहीत. गुन्हेगारीपासून परावृत्त करणारी पर्यायी व्यवस्था नसणे जेवढी खेदजनक तेवढीच गंभीर आणि समाजासाठी घातक ठरणार आहे.