शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याबाबत निर्णय का नाही?

By admin | Updated: September 9, 2014 05:26 IST

निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या मतदान केंद्रनिहाय मतमोजणी रद्द करण्याच्या निर्णयावर चार आठवड्यांत भूमिका स्पष्ट करा, असा आदेश देत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

निवडणुकीसंबंधी सध्याच्या नियमांमध्ये कोणतीही दुरुस्ती न करता हा बदल करता येऊ शकतो काय याबाबत न्यायालयाने निवडणूक आयोगाकडूनही उत्तर मागितले आहे. निवडणुकीनंतर मतदान केंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे विजयी उमेदवाराच्या मनात कमी मतदान झालेल्या ठिकाणच्या लोकांबाबत आकस आणि सूडाची भावना निर्माण होऊ शकते, असे सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने स्पष्ट केले. पाच वर्षांपूर्वी निवडणूक आयोगाने केंद्र सरकारला पत्र पाठवून प्रस्ताव दिल्यानंतर सरकारने हा मुद्दा विधी आयोगाकडे का सोपविला नाही आणि गेल्या पाच वर्षांमध्ये कोणताही निर्णय का घेतला नाही, असा प्रश्नही खंडपीठाने विचारला.
विधी आयोगावर जबाबदारी ढकलू नका..
विधी आयोगाला या मुद्याशी काही देणेघेणे नाही. तुमचे उत्तर काय ते आम्हाला कळायला हवे. विधी आयोगाच्या खांद्यावर जबाबदारी सोडून तुम्ही हा मुद्दा टांगणीवर ठेवू शकत नाही, असे खंडपीठाने खडसावले. या खंडपीठात कुरियन जोसेफ आणि आर.एफ. नरीमन यांचा समावेश आहे. 
गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन
मतदानकेंद्रनिहाय मतमोजणी जाहीर केल्यामुळे मतदानाशी निगडित गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन होत असल्याकडे एका याचिकेत लक्ष वेधण्यात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने १२ मे रोजी निवडणूक आयोगाचे उत्तर मागितले होते. 
संपूर्ण मतदारसंघातील मतमोजणीचा निकाल एकाचवेळी जाहीर केला जावा. त्यामुळे त्या मतदारसंघाला निधी पुरवठा करताना भेदभाव केला जाणार नाही आणि विकासातही संतुलन राखले जाईल. राजकीय सूड किंवा द्वेषभावनेने पक्षपात केला जाणार नाही, असा युक्तिवाद पंजाबचे वकील योगेश गुप्ता यांनी केला होता.
अजित पवारांच्या धमकीचा उल्लेख..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा काँग्रेसला मतदान न केल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी दिली होती, असा उल्लेख करीत वकील गुप्ता यांनी मतदान केंद्रनिहाय निकाल जाहीर झाल्याने धमकी आणि ब्लॅकमेल करण्याचे तंत्र अवलंबले जाऊ शकते, अशी साधार भीती व्यक्त केली होती. 
सध्याच्या निवडणूक निकालात एखाद्या पक्षाला कोणत्या वॉर्डात जास्त किंवा कुठे कमी मतदान झाले ते कळू शकते. 
एखाद्या पक्षाच्या किंवा विजयी उमेदवाराच्या बाजूने मतदान न करणार्‍या लोकांवर राजकीय सूड उगविण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करण्यासारखे प्रकार घडू शकतात,असेही याचिकाकर्त्याने म्हटले.