शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

काळा पैसा परत कधी आणणार?

By admin | Updated: October 5, 2014 01:45 IST

याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे,

मेहाम (हरियाणा) : याआधी कोणत्याच सरकारने काही केले नाही आणि आपले सरकार सत्तेत आल्यानंतरच सर्व काही करण्यात आले, असे दाखविण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चालविलेला आहे, अशी परखड टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली आहे. सत्तेत आल्यानंतर विदेशात जमा असलेला काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, असा सवालही सोनिया गांधी यांनी उपस्थित केला. हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील मेहाम येथे काँग्रेसच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या. 
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जणू काहीही चांगले घडलेले नाही आणि आपण एका रात्रीत प्रत्येकाचे भविष्य उजळून टाकू, असे वातावरण ते निर्माण करीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दिशेने त्यांनी एकतरी पाऊल उचलले आहे काय? महागाई कमी झाली काय? गरिबांना स्वस्त दरात भोजन मिळत आहेत काय? बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे काय? सत्तेवर आल्यानंतर शंभर दिवसांच्या आत विदेशातील काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्याचे काय झाले? या दिशेने एखादे पाऊल तरी उचलले आहे काय? नक्कीच नाही.’
काँग्रेस सरकारने मागील दहा वर्षात केलेल्या विकासकामाच्या आधारावरच पक्षाला मतदान करण्याचे आवाहन सोनिया गांधी यांनी यावेळी केली. पूर्वीच्या संपुआ सरकारने आखलेल्या धोरणांचे श्रेय भाजपा स्वत:कडे घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. खोटय़ा आश्वासनांना बळी पडू नका. गतिशील विकासासाठी पुन्हा काँग्रेसचे सरकार यावे यासाठी शहाणपणाने मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
 
च्मोदींवर प्रहार करताना सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, ‘रिकामे जहाज जास्तच गोंगाट करते. मोठय़ाने बोलता म्हणजे तुम्ही खरेच बोलता असे नव्हे.