शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

पावसामुळे खचलेली भिंत कोसळली, 15 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 3:45 PM

पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा भिंतीच्या रुपाने येथील रहिवाशांवर काळाने घाला घातला.

कोईम्बतूर- तामिळनाडूतील मेट्टपलायम येथे मोठी दुर्घटना घडली असून त्यामध्ये 15 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसामुळे भिंत कोसळून 10 महिलांसह 15 जणांचा मृत्यू झालाय. सततच्या पावसामुळे आणि जुनी असल्याने ही भिंत अतिशय कमकुवत झाली होती. आज पहाटे साधारण 5 वाजण्याच्या सुमारास ही 15 फुटी भिंत शेजारील घरांवर पडून मोठा अपघात झाला. 

पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा भिंतीच्या रुपाने येथील रहिवाशांवर काळाने घाला घातला. पहाटे ही भिंत शेजारी घरांवर कोसळल्याने घरातील व्यक्तींचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, या दुर्घटनेतील मृतांचे शव बाहेर काढण्यात आले. अद्यापही बचाव आणि मदतकार्य सुरूच आहे. 

मेट्टलयामय येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच, या दुर्घटनेत मृत्यु झालेल्या 2 चिमुकल्यांसह 15 जणांना भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहिली. तसेच, राज्यातील आपत्ती विभागाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही केली. 

 

 

टॅग्स :RainपाऊसTamilnaduतामिळनाडूDeathमृत्यू