शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीत आज मतदान; भाजप, आप अन् काँग्रेसची शक्ती पणाला

By admin | Updated: February 7, 2015 02:42 IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत आहे.

नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेली दिल्ली विधानसभेची प्रतिष्ठेची निवडणूक आज शनिवारी पार पडत असून चोख बंदोबस्तात १२,१७७ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे १.३३ कोटी मतदार हक्क बजावत आहेत. ७० जागांसाठी होत असलेली ही निवडणूक केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीसाठी सार्वमत मानले जात असले तरी भाजपच्या नेतृत्वाने हा दावा फेटाळला आहे.देशाची राजधानी असलेल्या दिल्लीवर झेंडा फडकविण्यासाठी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने पुन्हा गमावलेला जनाधार परत मिळवत पक्षात पुन्हा जोश आणल्यामुळे काट्याचा संघर्ष होऊ घातला आहे. मोदींची प्रतिमा पणाला लागल्यामुळे भाजपनेही संपूर्ण ताकद झोकली आहे. एकूण ६७३ उमेदवार रिंगणात असून अनेक मतदारसंघात तिरंगी लढतींनी चुरस निर्माण झाली आहे. एकूण ७१४ मतदान केंद्रे संवेदनशील तर १९१ मतदान केंद्रे अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत.जुगार चालणार काय?१६ वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या भाजपने टीम अण्णाच्या पूर्वाश्रमीच्या सदस्य किरण बेदी यांना थेट मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार ठरवत जुगार खेळला आहे. बेंदींच्या उमेदवारीने भाजपच्या तळागाळात असंतोष उफाळला असताना हा डाव साधला जाणार काय? असा सवाल राजकीय विश्लेषकांनी विचारला आहे. गेल्यावर्षी मे मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा प्रभाव काही अंशी कायम राहिला असला तरी मोदींची घोडदौड दिल्लीत थांबेल काय? याचे उत्तरही ही निवडणूक देणार आहे.भाजपची चिंता कायमनिवडणूक सर्वेक्षणांनी ‘आप’च्या झोळीत सत्तेचे माप टाकलेले दिसत असताना भाजपला पराभवाची चिंता लागलेली दिसून येते. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी हे सार्वमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी अशाच प्रकारच्या विधानाबद्दल सारवासारव केली तर अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सार्वमत ठरत नसल्याचे सांगत एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संरक्षणाची ढाल प्रदान केल्याचे मानले जाते. डिसेंबर २०१३ पर्यंत १५ वर्षे दिल्लीवर राज्य करणाऱ्या काँग्रेसची तिसऱ्या स्थानी पिछेहाट दाखविली जात आहे. किमान दुहेरी आकडा गाठण्याचे आव्हान या पक्षासमोर उभे ठाकले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) भाजपच्या जाहीरातीवरून वादंगभाजपने दिल्लीत शनिवारी मतदान होत असताना केंद्रातील मोदी सरकारच्या कामगिरीकडे लक्ष वेधणाऱ्या जाहिराती विविध वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध केल्यामुळे आपने आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष वेधले आहे. शुक्रवारी दिल्लीतील सर्व प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर भाजपच्या जाहिराती प्रसिद्धी झाल्या असून हे आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन असल्याचे ‘आप’चे नेते आशुतोष यांनी म्हटले. वावगे काहीही नाही- आयोगाचा खुलासा४भाजपने दिल्लीच्या मतदारांना शनिवारी मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्या असल्या तरी त्यात चूक काहीही नाही. भाजपने कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.बेदींनी लाटल्या पोळ्या, केजरीवालांचा योगाबेदींनी शुक्रवारी कृष्णनगर मतदारसंघातील एका गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर स्वयंपाकगृहात जाऊन लंगरसाठी पोळ्याही लाटल्या. शीख मतदारांना प्रभावित करण्याचा हा प्रयत्न मानला जातो. दुसरीकडे आप नेते अरविंद केजरीवाल यांनी योगा केला. तसेच गुरुद्वारात जाऊन प्रार्थना केली. मोदींना पंतप्रधानपदावरून पदावनती करीत मुख्यमंत्रिपदात स्वारस्य असल्याचे दिसते. अन्यथा त्यांनी भाजप सरकारने आठ महिन्यांत जे काम केले नाही त्याच्या जाहिराती कशाला केल्या असत्या? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी यांनी केला आहे. आम आदमी पार्टीला एक तर आचारसंहितेच्या कायद्याची माहिती नसावी किंवा या पक्षाचे नेते केवळ बातम्यांचा विषय बनण्यासाठी अशा प्रकारची विधाने करीत असावेत. असे प्रत्युत्तर भाजपने दिले.सर्वाधिक १८, सर्वात कमी ४ उमेदवारउत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघात सर्वाधिक १८ तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघात सर्वात कमी ४ उमेदवार आहेत. २०१३ मध्ये ७१ महिला रिंगणात होत्या यावेळी कमी म्हणजे ६३ महिला उमेदवार नशीब आजमावत आहेत. मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे २९६ उमेदवार असून त्यापैकी १८३ उमेदवार नोंदणीकृत पक्षांचे आहेत. तब्बल १९४ अपक्ष उमेदवारांनी निवडणुकीची रंगत वाढविली आहे.८६२ तृतीयपंथी मतदारदिल्लीत ७३,८९,०८९ पुरुष, ५९,१९,१२७ महिला तर ८६२ तृतीयपंथी असे एकूण १,३३,०९,०७८ मतदार आहेत.१८ ते १९ वर्षे वयोगटातील पहिलट मतदारांची संख्या २,२७,३१६ तर २० ते २९ वर्षे या युवागटातील ३६,९३,९७५ मतदार निर्णायक भूमिका बजावतील असे मानले जाते. विशेष म्हणजे शंभरी ओलांडलेल्या मतदारांची संख्या ३११ एवढी आहे. सर्वाधिक ३,४७,२४५ मतदार मतिया महल मतदारसंघात तर चांदणी चौकमध्ये सर्वात कमी १,१३,७७७ मतदार आहेत. ९३६९ मतदार बेघर आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ४१,०९५ टपाल मतपत्रिकांचा वापर झाला यावेळी ही संख्या ४३,२३५ असल्याचे सूत्रांनी सांगितले.स्ट्रॉँगरुमसाठी चोख सुरक्षा१४ ठिकाणी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन ठेवण्यासाठी स्ट्राँग रुम उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा असेल.१६ हजार कंट्रोल युनिट २० हजार बॅलट युनिटवर १२०० मायक्रो आॅबझर्व्हर निगराणी ठेवून असतील. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. कंट्रोल रुमद्वारे लाईव्ह वेबकास्टिंग केले जाईल.