शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग, योगी सरकारविरोधात काँग्रेस-बसपाने खेळले ब्राह्मण कार्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:41 IST

विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे.

ठळक मुद्देउत्तर प्रदेशमधील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात उघडली मोहिमकाँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेवरून सरकारवर केली टीकामायावती म्हणाल्या, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता कामा नये

लखनौ - तीन जुलै रोजी झालेल्या चकमकीत आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे याचा पोलिसांनी १० जुलै रोजी एन्काऊंटर केला होता. दरम्यान, या एन्काऊंटरवर विरोधी पक्ष आणि विविध संघटनांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यातच आता विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. तर काही जण फेसबूकवरूनच योगी सरकार पाडण्याची धमकी देत आहेत. दरम्यान, काँग्रेससारख्या पक्षाला सुद्धा आता विकास दुबेच्या एन्काऊंटरवरून खेळल्या जात असलेल्या ब्राह्मण कार्डामध्ये राजकीय संधी दिसू लागली आहे.   

उत्तर प्रदेशमधील अनेक ब्राह्मणांनी आपल्या फेसबूक पेजवरून विकास दुबेच्या एन्कांटरवरून उत्तर प्रदेश सरकारविरोधात मोहिम उघडली आहे. यात एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘तुम कार पलटो हम सरकार पलटाएंगे’. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले की, श्रीप्रकाश शुक्ला याच्या एन्काऊंटरनंतर कल्याण सिंह पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनू शकले नाहीत. म्हटलं आठवण करून देऊ. तर अन्य एका व्यक्तीने लिहिले आहे की, परशुरामाचा वंशज आहे पुन्हा कधीच ठाकूर समाजाच्या व्यक्तीला मत देणार नाही.दरम्यान, विकास दुबेची पत्नी आणि  मुलाचा फोटोही सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच काँग्रेसचे काही नेते २२ वर्षांच्या अमर दुबेचे एन्काऊंटर आणि त्याच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेला मुद्दा बनवत आहेत. काँग्रेसचे नेते प्रमोद कृष्णन यांनी प्रभात मिश्राचा एन्काऊंटर आणि अमर दुबेच्या पत्नीला करण्यात आलेल्या अटकेवरून सरकारवर टीका केली आहे.

 बसपाप्रमुख मायावती यांनीही या वादात उडी घेतली असून, ब्राह्मण समाज भीतीच्या छायेखाली आहे. कुठल्याही एका चुकीच्या व्यक्तीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा संपूर्ण समाजाला देता कामा नये. सरकारने कुठलेही असे काम करू नये ज्यामुळे ब्राम्हण समाज भयभीत होईल, असे मत मांडले आहे. मायावतींच्या या टीकेला काँग्रेस नेते नेते जितीन प्रसाद यांनीही समर्थन दिले आहेत. तसेच ब्राह्मण समाजाच्यावतीने त्यांचे आभारही मानले आहेत.

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथcongressकाँग्रेसmayawatiमायावती