शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

वेदनादायक! गंगेचं पाणी खवळले, वाळूत पुरलेले मृतदेह पाण्यावर तरंगले; २४ तासांत ४० अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 22:57 IST

मागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत

ठळक मुद्देमागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं.अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे.

प्रयागराज – मान्सूनच्या आगमनासोबतच उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीनं प्रशासनासमोर नवं आव्हान उभं केले आहे. गंगा नदीच्या किनारी वाळूत दफन केलेल्या मृतदेहांची समस्या वाढली आहे. हे दफन केले मृतदेह कोरोना रुग्णांचा असल्याचं संशय आहे. जसं जसं पाण्याच्या पातळीत वाढ होतेय तसं तसं वाळूत पुरलेले मृतदेह पुन्हा पाण्यावर तरंगताना दिसून येत आहेत.

मागील २ दिवसांपासून स्थानिक पत्रकारांकडून प्रयागराजच्या विविध घाटांवर मोबाईलवर काढलेले व्हिडीओ आणि फोटोत नगरपालिकेचे कर्मचारी मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. बुधवारी काढलेल्या फोटोत एक मृतदेह नदीच्या किनारी आल्याचं दिसतंय. भगव्या रंगाचं वस्त्र असलेल्या या मृतदेहाच्या हातात सफेद रंगाचा सर्जिकल ग्लोव्जपण आहेत. मृतदेह प्रयागराजच्या महापालिका कर्मचाऱ्यांनी बाहेर काढला.

महापालिकेचे अधिकारी नीरज सिंह म्हणाले की, मागील २४ तासांपासून ४० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आम्ही पूर्ण काळजीनं आणि प्रथेनुसार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहोत. इतकचं नाही तर एका मृतदेहाच्या तोंडात ऑक्सिजन ट्यूब असल्याचं निदर्शनास आलं. हा व्यक्ती मृत्यूपूर्वी आजारी असावा, कुटुंबाने त्याने इथेच सोडून पळ काढला असेल. ते घाबरल्याची शक्यता आहे. सर्व मृतदेहाची विल्हेवाट लागली नाही. काही मृतदेह अलीकडेच दफन केल्याचं दिसतं.

प्रयागराजच्या महापौर अभिलाषा गुप्ता नंदी यादेखील नदीच्या किनारी मृतदेहांवर होत असलेल्या अंत्यसंस्कारात मदत करताना दिसून आल्या. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्या म्हणाल्या की, अनेक समुदायांमध्ये मृतदेह दफन करण्याची अनेक वर्षापासून परंपरा आहे. मातीत ज्यारितीने मृतदेह दफन केल्यानंतर त्याची विल्हेवाट लागते तसं वाळूमध्ये होत नाही. आम्हाला जिथे मृतदेह सापडत आहेत. आम्ही तातडीने त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करत आहोत अशी माहिती त्यांनी दिली.  

मागील महिन्यातही उत्तर प्रदेश आणि बिहारच्या अनेक नद्यांमध्ये मृतदेह तरंगताना दिसून आले होते. स्थानिक राज्य सरकार लोकांना आवाहन करत होती की, जर कुणाला काही कारणास्तव मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणं जमत नसेल तर याबाबत आम्हाला कळवा, शासकीय व्यवस्थेतून या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. तरीही अनेकजण नद्यांमध्ये मृतदेह फेकत असल्याचं समोर आलं होतं.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्या