शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

“उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 17:44 IST

corona and lackness of oxygen: केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर टीका करत आहे.

ठळक मुद्देकेंद्रीय मंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकाउद्धव ठाकरेंच्या क्लृप्त्या पाहून दुःख - गोयलकेंद्राकडून राज्यांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न - गोयल

नवी दिल्ली: गेल्या सलग तीन दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांवर पोहोचली आहे. देशभरातील परिस्थिती गंभीर आणि भीतीदायक होत चालली आहे. कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांची कमतरता जाणवू लागली असून, बेड्स आणि ऑक्सिजन यांची व्यवस्था अपुरी पडू लागली आहे. अनेक ठिकाणी रुग्णांचे हाल होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता राजकारणही तापताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच विरोधी पक्ष भाजपही ठाकरे सरकारवर टीका करत आहे. आता केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. (union minister piyush goyal criticised cm uddhav thackeray on lackness of oxygen)

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आता केंद्रीय पियुष गोयल यांनी महाराष्ट्र सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा खरपूस समाचार घेतला आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी, अशी टीका गोयल यांनी केली आहे. गोयल यांनी यासंदर्भात ट्विट केली आहेत.

उद्धव ठाकरेंच्या क्लृप्त्या पाहून दुःख

ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेल्या क्लृप्त्या पाहून दु:ख झाले. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचे उत्पादन व्हावे, यासाठी प्रयत्नशील आहे. आताच्या घडीला आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत आहोत. उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजनही वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे, असे गोयल यांनी म्हटले आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे, असेही गोयल यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये सांगितले.

“पंतप्रधान मोदींना ‘मृत्यूचा उत्सव’ साजरा करण्याची हौस”

केंद्राकडून राज्यांच्या गरजा पुरवण्याचा प्रयत्न 

केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांनी या संकटकाळात एकत्रपणे काम करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रत सध्या अकार्यक्षम आणि भ्रष्ट सरकार आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या लोकांसाठी योग्य ते काम करत आहे. महाराष्ट्रातील नागरिक माझे कुटुंब माझी जबाबदारीचे योग्य पद्धतीने पालन करत आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी त्यांची कर्तव्य पाळून माझे राज्य, माझी जबाबदारी हे तत्व पाळण्याची वेळ आली आहे, या शब्दांत गोयल यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.

निवडणुकांमध्ये कोरोनाची ‘रॅली’; बंगालमध्ये ४२० टक्के, तर आसामामध्ये ५३२ टक्के रुग्णवाढ

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेpiyush goyalपीयुष गोयलState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपा