शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

'मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नाही'; भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 7:09 PM

काही दिवसांपासून सुरू असलेली कांद्यासह लसणाची दरवाढ काही केल्या थांबलेली नाही.

नवी दिल्ली: देशभरात कांद्याचे दर वाढल्याने विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे कांद्याच्या वाढत्या दरामुळे आर्थिक गणित देखील कोलमडलं आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून सरकारकडून यावर कोणत ठोस पाऊल उचलणार याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. मात्र कांद्याच्या बाबतीत केंद्रीय मंत्र्यांकडून वेगवेगळे वक्तव्य केले जात असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कांदे दरवाढच्या प्रश्नावर मी फार लसूण, कांदा खात नाही. आमच्या कुटुंबातही कांदा, लसूण फारसा खाल्ला जात नाही असं विधान केलं होतं. यानंतर निर्मला सीतारामन यांच्यावर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी टीका केली होती. त्यातच आता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी मी आयुष्यात कधीही कांद्याची चव चाखलेली नसल्याने कांद्याचा भाव काय आहे हे मला कसं कळणार असं अजब विधान केल्यामुळे निर्मला सीतारामन यांच्यानंतर आता अश्विनी चौबे यांना ट्रोल करण्यात येत आहे.

देशातील कांद्याची एकूण मागणी आणि देशांतर्गत कांद्याचा साठा यात पडलेला खड्डा या आयातीमुळे भरून निघालेला नाही. त्यामुळेच सध्या कांद्याने कुठे प्रति किलो दीडशेचा टप्पा गाठला आहे तर बऱ्याच ठिकाणी शंभरी पार केली आहे. म्हणजे सप्टेंबरमध्ये निर्यात शुल्कवाढ जशी उपयुक्त ठरली नाही तशीच आता केलेली आयातही तूर्त तरी निष्प्रभ ठरली आहे.  किरकोळ बाजारात १००-१२० रुपये किलो दरानं नागरिकांना विकत घ्यावा लागतोय. तसेच कांद्याचा सध्याचा दर हा गेल्या 70 वर्षांतील उच्चांक म्हटला जात आहे. 

टॅग्स :onionकांदाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनEconomyअर्थव्यवस्था