शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

खादी ग्रामोद्योगची उलाढाल प्रथमच दीड लाख कोटी रुपयांवर; ‘मन की बात’मध्ये PM मोदींचा संवाद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 06:31 IST

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात पंतप्रधान मोदी यांंनी जनतेला संबोधित केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : खादी ग्रामोद्योगची उलाढाल पहिल्यांदाच दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे आणि खादी आणि हातमागाच्या वाढत्या विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी स्पष्ट केले. 

आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या ११२ व्या भागात मोदी म्हणाले की, ज्यांनी पूर्वी कधीही खादी उत्पादने वापरली नाहीत, तेही आज मोठ्या अभिमानाने खादी वापरतात. देशवासीयांना खादीचे कपडे खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. भारताच्या ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी लोकांना केले. गणित ऑलिम्पियाडमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आसामच्या ‘मोइदाम्स’चा समावेश केल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले.

‘भारत अमली पदार्थमुक्त करा’

अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित काळजी व्यक्त केली. भारत अमली पदार्थमुक्त करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांना मदत करण्यासाठी ‘मानस’ची हेल्पलाइन आणि पोर्टल काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले असून सरकारने १९३३ हा टोल फ्री क्रमांकही जारी केला आहे. 

विक्रीत ४०० टक्के वाढ

खादीची विक्री ४०० टक्के वाढली आहे. देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत आणि स्त्रिया याच्याशी सर्वाधिक जोडलेल्या असल्याने त्यांचा सर्वाधिक फायदाही होत आहे. लाेकांनी या वर्षापासूनच खादीचे कपडे खरेदी करायला सुरुवात करावी, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सर्वाधिक वाघ भारतात असल्याचा अभिमान

जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याचे अधोरेखित करून ते म्हणाले की याचा आम्हाला अभिमान आहे. हर घर तिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर राष्ट्रध्वजासह सेल्फी अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले. 

 

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार