हवाई वाहतूक क्षेत्राला 'इंधन संकटाचा'विळखा! विमान कंपन्यांची उडाली झोप; काय आहे नेमकं कारण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:58 IST2026-04-28T16:26:00+5:302026-04-28T16:58:42+5:30
भारतीय विमान कंपन्यांची सर्वोच्च संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्सने वाढत्या जेट इंधनाच्या किमतींबाबत गंभीर इशारा दिला आहे. विमान इंधनाच्या किमती अत्यंत अनिश्चित झाल्या आहेत.

हवाई वाहतूक क्षेत्राला 'इंधन संकटाचा'विळखा! विमान कंपन्यांची उडाली झोप; काय आहे नेमकं कारण?
भारतातील प्रमुख विमान कंपन्यांची संघटना असलेल्या 'फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्स'ने जेट इंधनाच्या वाढत्या किमतींबाबत केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला आहे. सध्याचे अनिश्चित दर विमान कंपन्यांसाठी अत्यंत घातक ठरत असून, तातडीने मदत न मिळाल्यास देशातील विमान वाहतूक उद्योग ठप्प होण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे एफआयएने पत्रात म्हटले आहे.
एफआयए, ही एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाईसजेट यांसारख्या दिग्गज कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते, त्यांच्या मते परदेशातील कामकाजासाठी एटीएफच्या दरात प्रति लिटर ७३ ते ७५ रुपयांनी वाढ झाली आहे. या प्रचंड दरवाढीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हवाई मार्ग आर्थिकदृष्ट्या महाग झाले असून कंपन्यांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे.
सध्याच्या दरप्रणालीबद्दल काय?
एफआयएने सध्याच्या दरप्रणालीवर टीका केली असून, एटीएफ दरप्रणालीमुळे एअरलाइन नेटवर्क अव्यवहार्य आणि अस्थिर होत असल्याचे म्हटले आहे. या संस्थेने पुढे असेही म्हटले आहे की, या असंतुलनामुळे मार्गांचे अर्थशास्त्र बिघडत आहे आणि एअरलाइन्सना त्यांच्या नेटवर्कच्या व्यवहार्यतेवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले जात आहे.
एफआयएच्या मते, परदेशातील कामकाजासाठी एटीएफच्या दरात प्रति लिटर ७३-७५ रुपयांनी वाढ झाली आहे, ज्यामुळे काही मार्ग पूर्णपणे अव्यवहार्य झाले असून मोठे नुकसान होत आहे. यामुळे कमी खर्चाच्या केंद्रांमधून कार्यरत असलेल्या परदेशी विमान कंपन्यांशी स्पर्धा करणाऱ्या भारतीय विमान कंपन्यांच्या नफ्यात आणखी घट झाली आहे.
विमानसेवा विस्कळीत होण्याचा धोका
जर दरांमध्ये सुधारणा झाली नाही, तर विमान कंपन्यांना अनेक मार्गांवरील सेवा कमी करावी लागेल किंवा बंद करावी लागेल.
सध्याच्या एटीएफ दरप्रणालीमुळे एअरलाइन नेटवर्क अस्थिर होत आहे, अशी टीका संघटनेने केली आहे. परदेशी विमान कंपन्या कमी खर्चाच्या केंद्रांमधून काम करत असताना, भारतीय कंपन्यांना मात्र वाढीव दरामुळे त्यांच्याशी स्पर्धा करणे कठीण जात आहे.