शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण रेषा ओलांडून पुन्हा दहशतवाद्यांना टार्गेट करु - भारत

By admin | Updated: October 10, 2016 11:56 IST

29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 10 - पाकिस्तान नियंत्रण रेषेपलीकडून दहशतवादाची निर्यात करणार असेल तर, भारतीय लष्करही नियंत्रण रेषा ओलांडायला मागे-पुढे पाहणार नाही. 29 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राईक्समधून आम्हाला हाच संदेश द्यायचा होता असे केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादाच्या विषयावर भारताची भूमिका 1999 पेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. पाकिस्तानने त्यावेळी कारगिलमध्ये घुसखोरी करुनही भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली नव्हती.  फक्त पाकिस्तानी सैन्याला भारतीय भूमीतून पिटाळून लावले होते. भारताची आताची भूमिका त्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे असे सूत्रांनी सांगितले. 
 
दहशतवादी भारतावर हल्ले करणार असतील तर, भारतही त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार राखून आहे. पाकिस्तानचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी सहा जानेवारी 2004 रोजी पाकिस्तानच्या नियंत्रणातील प्रदेशातून भारता विरोधात दहशतवादी कारवाया होऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. पाकिस्तानला आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे. दहशतवादी आणि त्यांना मदत करणा-या पाकिस्तानी लष्कराला संदेश देण्याचा या सर्जिकल स्ट्राईक्स मागचा मूळ उद्देश होता असे या अधिका-यांने सांगितले.