शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

काही शक्ती देशात अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नात - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 11:08 IST

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

एकतानगर : देश व विदेशातील काही शक्ती या भारतामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा, तसेच साऱ्या जगात देशाची प्रतिमा नकारात्मक करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा शहरी नक्षलवाद्यांची ओळख पटवून त्यांना उघडे पाडा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जनतेला केले. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकतानगर येथे असलेल्या पटेल पुतळ्याच्या (स्टॅच्यू ऑफ युनिटी) ठिकाणी पंतप्रधान मोदी यांनी भेट दिली व पटेल यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी मोदी म्हणाले की, भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे देश व विदेशातील काही शक्ती आपल्या देशाच्या आर्थिक हिताला बाधा आणू इच्छितात. जगभरातील गुंतवणूकदारांच्या मनात भारताबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचा या लोकांचा प्रयत्न आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे काही लोक लष्करावर टीका करतात, तसेच लष्करामध्ये फुटीरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत. (वृत्तसंस्था)

‘काही जणांचे दुही माजविण्याचे काम’ नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, काही लोक नेहमी लोकशाही, राज्यघटनेबद्दल बोलत असतात व प्रत्यक्षात ते देशात दुही माजविण्याचे काम करतात. या शहरी नक्षलवाद्यांची कारस्थाने जनतेने वेळीच ओळखावीत. नक्षलवाद संपवत आणला आहे. आता शहरी नक्षलवाद डोके वर काढत आहे. त्यांच्या विरोधात लढा देणे आवश्यक आहे. गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे देशातील नक्षलवादी चळवळ आता अखेरचा श्वास घेत आहे. पटेल यांची १५०वी जयंती देश दोन वर्षे साजरी करणार आहे, असेही माेदी म्हणाले.

‘योजनांमध्ये ऐक्याचा विचार’पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमच्या केंद्र सरकारने अमलात आणलेल्या योजनेमध्ये देशातील ऐक्याचा प्राधान्याने विचार केला आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान आवास योजना, जीएसटी आदी योजनांचा उल्लेख केला.  भारतीय राज्यघटनेच्या तरतुदी जम्मू-काश्मीरमध्ये लागू करण्यात अडथळे ठरणारे ३७० कलम आमच्या सरकारने रद्द केले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेला स्मरून आपल्या पदाची शपथ घेतली. ही मोठी घटना आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी