शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

२०१६ विधानसभा निवडणूकतील काही लक्षवेधी घटना

By admin | Updated: May 19, 2016 16:24 IST

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील लक्षवेधी घटना...

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ -  पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने ईशान्य भारतातील महत्वाचे राज्य असलेल्या आसाममध्ये मुसंडी मारली असून तेथील काँग्रेसचे राज्य खालसा झाले आहे. तर पश्चिम बंगाल व तामिळनाडूमध्ये अपेक्षेप्रमाणेच ममता बॅनर्जी व जयललिता यांची सत्ता कायम राहिली आहे. 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
या पाच राज्यांच्या निवडणूक निकालातील काही लक्षवेधी घटना : 
१) पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांत काँग्रेसची कामगिरी खालावली आहे. लोकसभा निवडणूक, महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेसला पराभवाचा आणखी एक मोठा धक्का बसला आहे. देशातील २९ पैकी फक्त सहा राज्यात सध्या काँग्रेस सत्तेत असून केरळ, आसाममधील सत्ताही काँग्रेसने गमावली आहे. 
 
२) केरळमध्ये राष्ट्रवादीचा दे धक्का : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचा पक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने केरळच्या राजकारणात चंचू प्रवेश केला आहे, कुट्टनाड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार थॉमस चांडी विजयी झाले, तर दुसरीकडे इलथूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार ए के ससींद्रन यांनी जनता दल युनायटेडच्या (जेडीयू) किशन चंद यांचा  मतांनी पराभव केला.
 
३) देशभरात हळूहळू पण ठामपणे भारतीय जनता पक्षाचा विस्तार होत आहे. सध्या देशात भाजपा ९ राज्यांमध्ये सत्तेवर असून ४ राज्यांमध्ये भाजपा भागीदारीमध्ये सत्तेत आहे. 
 
४) स्थानिक नेतृत्व ठरले महत्वाचे : दिल्ली व बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून भाजपाने धडा शिकला असून निवडणूक जिंकण्यासाठी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा पुरेसा नाही हे त्यांना उमजले आहे. स्थानिक निवडणूका याही अतिशय महत्वाच्या असून त्यासाठी खंबीर स्थानिक नेतृत्व व मुख्यमंत्रीपदाचा प्रबळ दावेदार असणंही तितकंच महत्वाचे असल्याचे भाजपाने हेरले आहे. आसाममध्ये सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून, हे त्यातूनच आलेलं शहाणपण होतं आणि त्याचा निकाल सर्वांसमोर आहे. तब्बल १५ वर्षांनंतर काँग्रेसने आसाममधील सत्ता गमावली आहे. 
 
५) राजकारणाला वयाची मर्यादा नाही : भारतीय परंपरेनुसार ६० व्या वर्षानंतर लोकांनी सर्व मोहमायांचा त्याग करून वानप्रस्थाश्रमाचे आचरण केले पाहिजे, भारतीय राजकारणात मात्र हा नियम बिलकूल लागू होत नाही. सव्वाशे कोटी भारतीयांमधील निम्मी लोकसंख्या ही तरूणांची असतानाही भारतीय राजकारण अद्यापही वयोवृद्धांचीच चलती असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे केरळात पुन्हा सत्तेवर आलेला डाव्यांचा एलडीएफ आणि त्यांचे नेतृत्व करणारे व्ही. एस. अच्युतानंदन. ९३ वर्षी अच्युतानंदन यांनी आपल्या करिष्म्याचा जोरावर केरळमध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवली असून १४० सदस्यांच्या केरळ विधानसभेत डाव्यांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. 
 
७) श्रीसंतचा राजकारणातही नो-बॉल: क्रिकेटच्या मैदानात फिक्सिंगच्या आरोपामुळे दरवाजे बंद झाल्यानंतर राजकारणाच्या पीचवर भाजपकडून खेळायला उतरलेल्या श्रीशांत पहिल्याच निवडणुकीत बाद झाला. भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या श्रीशांतचा काँग्रेस नेते व्ही.एस.शिवकुमार यांनी पराभव केला. 
 
८) गेल्या अनेक वर्षांपासून केरळ विधानसभेत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करणा-या भाजपला ओ राजागोपाल यांच्या रुपाने पहिले यश मिळाले आहे. ओ राजागोपाल केरळच्या नेमॉम विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.  
 
९) महाभारतातील द्रौपदीचा राजकारणात पराभव - पश्चिम बंगालमध्ये उत्तर हावडा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणा-या रुपा गांगुली यांचा पराभव झाला. क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाने त्यांचा पराभव केला. द्रौपदीच्या भूमिकेसाठी त्या ओळखल्या जातात.