शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
2
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
3
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
4
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
5
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
6
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
7
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
8
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
9
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
10
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
11
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
12
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
13
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
14
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

1962मध्येही दिसले होते असेच सूर्य ग्रहण, ज्योतिष शास्त्रात युद्धाचे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 3:26 PM

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

ठळक मुद्देचीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता.1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही.

नवी दिल्ली : आज 2020मधील पहिले सूर्यग्रहण दिसले. या खगोलीय घटनेसंदर्भात ज्योतिष तज्ज्ञांचे आकलन फारसे चांगले संकेत देत नाही. ज्योतिषांचे म्हणणे आहे, की ग्रहांचा असा संयोग 1962मध्ये झाला होता. जेव्हा एका पाठोपाठ एक असे तीन ग्रहण लागले होते. काहीसे असेच यावेळीही होत आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार, या सूर्यग्रहणावेळी नक्षत्रांचा ज्या प्रकारे संयोग झाला तसा गत 500 वर्षांतही झालेला नाही. ज्योतिष तज्ज्ञांनी म्हटले आहे, की ग्रह-नक्षत्रांच्या अशा संयोगामुळे जगात मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती यईल आणि ती संपूर्ण जगात थैमान घालू शकते.

PHOTO : 'या' महत्वाच्या भागावर चीनने केलाय कब्जा, आहे वादाचा सर्वात मोठा मुद्दा

सूर्यग्रहणादरम्यान ग्रहांचा संयोग विनाशकारी -ज्योतीष पंडित प्रतीक भट्ट यांच्या मते, ग्रह नक्षत्रांची एकूण स्थिती अत्यंत भयावह आहे. नैसर्गिक आपत्तीचा धोका कायम राहील. ज्योतिष शास्त्रानुसार, या काळात ग्रहांचा संयोग अत्यंत  विनाशकारी आहे. यांच्या प्रभावामुळे नैसर्गिक आपत्ती, भूकंप, सैन्यांतील झटापट अथवा युद्धही होऊ शकते.

गलवानमध्ये अडकले भारतीय जवान; 'या' महत्वाच्या भागात 8 किमी आत घुसला चीन, बंकर्सही बनवले

ज्योतिषशास्त्राचे म्हणणे आहे, की 1962मध्येदेखील ग्रह नक्षत्रांची अशीच स्थिती निर्माण झाली होती. अत्ताच 5 जूनला चंद्र ग्रहण झाले. दुसरे सूर्यग्रहण आज आहे. यानंतर आता जुलैमध्येही एक ग्रहण आहे. यापूर्व 1962मध्येदेखील असाच योग तयार झाला होता आणि सलग तीन ग्रहण झाले होते. 58 वर्षांपूर्वी 17 जुलै 1962 रोजी चंद्रग्रहण, 31 जुलैला सूर्य ग्रहण आणि 15 ऑगस्टला दुसऱ्यांदा चंद्रग्रहण लागले होते. 

भारतासाठी धोका बनलाय चीन, हा 'खास' मित्र लवकरच देणार 33 फायटर जेट

आपल्याला माहीतच असेल, की चीनने 1962मध्ये धोका देऊन भारतावर हल्ला केला होता आणि आताही लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात हिंसक झटापट झाली आहे. 

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, ज्योतिषाचार्य प्रतीक भट्ट यांनी दावा केला, की 7 जुलैपूर्वी भारत चीनविरोधात मोठे पाऊल उचलेल आणि इतर काही देशही भारताच्या बाजूने उभे राहतील. मोठे युद्ध होईल असे वाटत नाही. मात्र छोटे युद्ध अथवा हिंसक झटापट होण्याची पूर्ण शक्यता आहे.

India China Face Off : सुखोई ते मिराज, चीनचा सामना करण्यासाठी भारतानं तैनात केली शक्तीशाली लढाऊ विमानं

टॅग्स :Astrologyफलज्योतिषIndiaभारतchinaचीनwarयुद्धSoldierसैनिक