शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

चीनशी युद्ध झाल्यास शिया मुसलमान भारतासाठी प्राण देण्यासही तयार; धर्मगुरुचं पंतप्रधानांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 1:18 PM

देशाच्या सीमा रक्षणासाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्यासोबत आम्ही आहोत. आमचा समुदाय भारतच्या संरक्षणासाठी प्राणही देण्यास मागे हटणार नाही असं कल्बे जवाद यांनी पत्रात म्हटलं आहे.

ठळक मुद्देकारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय सैन्याला पूर्णपणे मदत केली होती. संपूर्ण देशभरातील शिया मुसलमान नेहमी भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी तयारदेशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिक एक सैनिक बनण्यासाठी तयार

नवी दिल्ली – भारत आणि चीन यांच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इमाम ए जुमा आणि शिया धर्मगुरु मौलाना कल्बे जवाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. चीनने जे भारतीय सैन्यासोबत अमानुष वर्तवणूक केली त्याचं उत्तर भारतीय जवानांनी चीनला सडेतोड दिलं, यापुढेही जवान चीनला उत्तर देण्यास सक्षम आहेत. ज्यारितीन कारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय लष्काराला पूर्णपणे सहकार्य केले तसेच चीनसोबत युद्ध झाल्यास देशातील शिया मुसलमान एकत्र देशासोबत उभे राहू. देशाच्या रक्षणासाठी शिया मुसलमान जीवाची बाजी लावण्यासही तयार आहेत असं त्यांनी पंतप्रधानांना सांगितले आहे.

कल्बे जवाद यांनी पत्रात लिहिलं आहे की, तुमचं आरोग्य चांगले असेल ही अपेक्षा आहे. या पत्राच्या माध्यमातून इतकचं सांगतो, गेले काही दिवस भारत आणि चीन यांच्यात सीमेवर विशेषत: गलवान खोऱ्यात जो संघर्ष सुरु आहे. आपले सैनिक चीनला जशात तसे उत्तर देत आहेत. धाडसाने भारतीय जवान या संघर्षाचा सामना करत आहे. यापुढेही सैन्य सक्षम आहेत. युद्ध आपल्या सीमेवर घोंगावत आहे. देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिक एक सैनिक बनण्यासाठी तयार आहे. कारगिल युद्धातही प्रत्येक नागरिकाने भारतीय लष्कराला साथ दिली आहे असं ते म्हणाले.

कारगिल युद्धात शिया मुसलमानांनी भारतीय सैन्याला पूर्णपणे मदत केली होती. त्याचप्रकारे लेह आणि लडाखमधील शिया भारतासोबत आणि चीनविरोधात प्रत्येक पावलावर उभे राहतील. फक्त लेह, लडाख आणि कारगिल नव्हे तर संपूर्ण देशभरातील शिया मुसलमान नेहमी भारतीय सीमेच्या संरक्षणासाठी तयार आहेत. देशाच्या सीमा रक्षणासाठी जो काही निर्णय घेतला जाईल त्यासोबत आम्ही आहोत. आमचा समुदाय भारतच्या संरक्षणासाठी प्राणही देण्यास मागे हटणार नाही असं कल्बे जवाद यांनी पत्रात म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींचा चीनला संदेश

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरूवात होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी संवाद झाला. यावेळी मोदी म्हणाले, आज आपले वीर जवान सीमेवर मातृभूमीच्या रक्षणासाठी उभे आहेत. हे सभागृह आणि सभागृहातील सर्व सदस्य एका आवाजात, एका भावनेने, एक संदेश देतील, की संपूर्ण देश भारतीय जवानांच्या पाठीशी उभा आहे.

दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचण्याचा चीनचा प्रयत्न

पूर्व लडाखमध्ये LAC वर गेल्या तीन महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. भारतीय जवानांनी चीनला त्याच्याच हद्दीत रहायला भाग पाडले आहे. यामुळे चीन आता दुसऱ्या मार्गाने भारताविरोधात कट रचत आहे. इंग्रजी वृत्तपत्र इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, एक मोठा खुलासा झाला आहे. या वृत्तानुसार, चीन भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अशा देशातील तब्बल दहा हजार अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची हेरगिरी करत आहे.

इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. चीन सरकार काही कंपन्यांच्या माध्यमातून भारतात हेरगिरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच शेनजेन ही कंपनी भारतात तब्बल 10 हजार लोकांची हेरगिरी करत असून, या कंपनीचा चीन सरकार आणि चीनमधील कम्युनिस्ट पक्षाशी थेट संबंध असल्याचेही उघडकीस आले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने टिकटॉकसह शेकडो चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही हेरगिरी उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.   

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावNarendra Modiनरेंद्र मोदीMuslimमुस्लीमIndian Armyभारतीय जवान