शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

डाळ शिजेना!

By admin | Updated: October 20, 2015 04:35 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी अखेर डाळी, खाद्यतेल आणि खाद्य तेलबियांच्या साठ्यावर ११ महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. वाढत्या दरामुळे गरिबाघरी डाळ शिजेना म्हणून, केंद्र सरकारने या वस्तूंचा साठा करण्याकरिता लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील आदेश जारी केले. राज्यात डाळी, खाद्यतेले आणि तेलबियांची साठेबाजी करण्यावरील निर्बंध ३० सप्टेंबर २०१६पर्यंत लागू असणार आहेत. यापूर्वी एप्रिल २०१५मध्ये डाळी आणि खाद्यतेलांच्या साठवणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी काढण्यात आलेले आदेश रद्द करण्यात आले आहेत. आजच्या आदेशानुसार डाळी, खाद्यतेलबिया आणि खाद्यतेल यांच्या साठवणुकीवर सरकारने फेब्रुवारी २०१०मध्ये लागू केले तसे निर्बंध लागू राहतील.या उपाययोजनेनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून राज्यातील परिस्थितीवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येणार असून, याबाबत दररोज सायंकाळी विभागाकडून आढावा घेण्यात येणार आहे, असे या विभागाचे सचिव दीपक कपूर यांनी सांगितले आहे. दरम्यान, केंद्र शासनाने डाळींचा काळाबाजार व साठेबाजीविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महाराष्ट्रात मागील दोन महिन्यांमध्ये सामान्य नागरिक, बाजार समित्यांचे प्रतिनिधी व विरोधी पक्षही साठेबाजी थांबविण्याची मागणी सातत्याने करीत आहेत. एक वर्षापासून डाळी बाजार समितीमधून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे साठेबाजांवर बाजार समिती कारवाई करीत नाही. शासनाने कारवाई करणे अपेक्षित असताना बाजारभाव २०० रुपयांपेक्षा जास्त झाल्यानंतरही अद्याप एकाही साठेबाजावर कारवाई केलेली नाही. (विशेष प्रतिनिधी)२५ लाखांची डाळ चोरीलानागपूरमध्ये २५ लाख रुपये किमतीची तुरीची डाळ चोरीला गेल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. कळमना पोलिसांनी रविवारी या प्रकरणी ट्रकचालक व अन्य काही जणांना ताब्यात घेतले. साठवणुकीच्या मर्यादा अशाघाऊक आणि किरकोळ डाळ विक्रेत्यांसाठी साठा मर्यादा महानगरपालिका, अ वर्ग पालिका क्षेत्र इतर ठिकाणी अनुक्र मे ३५०० व २०० क्विंटल, २५०० व १५० क्विंटल आणि १५०० व १५० क्विंटल याप्रमाणे असेल.खाद्यतेलबियांसाठी (टरफले असलेल्या शेंगदाण्यासह) साठा मर्यादा घाऊक आणि किरकोळ विक्रे त्यांसाठी महापालिका क्षेत्र आणि इतर ठिकाणी अनुक्र मे २००० व २०० क्विंटल आणि ८०० व १०० क्विंटल अशी असेल. (शेंगदाणे अथवा बियांसाठी याप्रमाणाच्या ७५ टक्के साठा मर्यादा लागू राहील.)सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या बाबतीत महापालिका क्षेत्रातील घाऊक विक्रे ते १००० क्विंटल, तर किरकोळ विक्रे ते ४० क्विंटल खाद्यतेल साठवू शकतील. इतर ठिकाणी मात्र या मर्यादा घाऊक व किरकोळ विक्रेत्यांसाठी अनुक्र मे ३०० व २० क्विंटल याप्रमाणे असतील.डाळींच्या किमती एक वर्षात दुप्पटदसरा, दिवाळी जवळ आली असताना डाळींचे भाव गगनाला भिडले आहेत. एक वर्षात तूरडाळ तिप्पट व इतर डाळींचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. गेल्या एक वर्षामध्ये भाववाढीने विक्रम केला आहे.