शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 2:02 PM

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली.

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली. न्यायाधीश एनव्ही रमन्ना म्हणाले की, काल रात्री १ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहात होतो आणि प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट आम्हाला आत्ता मिळाला आहे. याआधीच्या सुनावणीवेळी आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढील सुनावणीच्या कमीत कमी एक दिवस आधीच स्टेटस रिपोर्ट सादर केला जावा. पण तसं झालेलं दिसत नाही. 

उत्तर प्रदेश सरकारकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कोर्टासमोर संबंधित प्रकरणाचा प्रगती अहवाल सादर केला असून सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. पण कोर्टानं सुनावणी टाळण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. सुनावणी टाळणं योग्य ठरणार नाही, असं सांगत खंडपीठाकडून कोर्टातच सरकारनं सादर केलेल्या रिपोर्टचं वाचन केलं जात आहे. 

फक्त चार आरोपींना अटक का?लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार मागे हटत आहे, असं रोखठोक मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. या प्रकरणात तुम्ही फक्त ४ जणांची साक्ष का नोंदवली? इतर साक्षीदारांची साक्ष का नोंदवली नाही? फक्त ४ जणच पोलीस कोठडीत आणि इतर न्यायालयीन कोठडीत का? त्यांच्या चौकशीची गरज नाही का?, असे सवाल कोर्टानं उपस्थित केले. कोर्टानं प्रकरणाची सुनावणी २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच याप्रकरणाशी निगडीत साक्षीदार आणि पीडीतांचे जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्याही सूचना सरकारला केल्या आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय