शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:02 IST

काँग्रेस आणि भाजप नेते परत एकदा वीर सावरकरांवरुन आमने सामने आले आहेत.

नवी दिल्ली: वीर सावरकर पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंमध्ये सावरकरांचा फोटो दिसल्यानंतर हे प्रकरण उफाळून आले आहे. काँग्रेसच्या दौऱ्यात वीर सावरकरांचा फोटो दाखवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली, तर काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. बटेश्वर प्रकरणात वीर सावरकरांची माफी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची साक्ष यासंबंधीचा वादही त्यांनी उघड केला.

छपाईदरम्यान चूक झालीभाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरचा फोटो ट्विट केला होता. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मधोमध वीर सावरकरांचा फोटोही आहे. यावर काँग्रेसने स्वतःचा बचाव करत याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे. पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांचे चित्र हवे होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एका बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सांगितले की, पोस्टर डिझाइन करणाऱ्या मुलाने हे फोटो ऑनलाइन शोधले होते. त्यांने नीट न तपासता ही छपाई केल्याचे काँग्रेसचे म्हणने आहे.अमित मालवीय यांची खोचक टीकाहे पोस्टर केरळमधील एर्नाकुलम विमानतळाजवळ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोटोसोबत अमित मालवीय यांनी लिहिले – 'एर्नाकुलममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचाही फोटो आहे. उशीरा का होईना, राहुल गांधींना जाणीव झाली. राहुल यांचे पणजोबा नेहरू पंजाबच्या नाभा तुरुंगात असताना इंग्रजांना विनंती करुन अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर आले होते.' 

जयराम यांचा भाजपवर पलटवारअमित मालवीय यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. 'तुम्हाला वस्तुस्थिती माहित नाही. एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवून, तुम्ही बदनामी करता. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षही असे प्रश्न उपस्थित करत आहे. व्हीपी सिंग सरकारच्या काळात सीपीएम आणि भाजपची युती होती, तसाच प्रकार सुरू आहे,' असं ते म्हणाले.खेरांनी ‘बटेश्वर साक्षी’चा मुद्दा उपस्थित केलाकाँग्रेस नेते पवन खेरा यांनीही याबाबत भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली आणि त्यांनी कधीही दयेचा अर्ज लिहिला नाही. प्रथम सावरकरांनी, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि इतरांनी लिहिला. बटेश्वरच्या साक्षीचे काय?' असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.

काय आहे 1942चे बटेश्वर प्रकरण?

बटेश्वरचे प्रकरण 1942 सालचे आहे. या वादाने अटलबिहारी वाजपेयींचा कधी पिच्छा सोडला नाही. अटलबिहारी वाजपेयी हे आग्रा जवळील बटेश्वरचे रहिवासी होते. त्यांच्यावर आरोप आहे की, 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू असताना त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या घटनेची इंग्रजांसमोर साक्ष दिली होती, त्यामुळे 4 स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती. वाजपेयींनी या वादातून अनेकवेळा दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण 2004 मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत लढवणारे राम जेठमलानी यांनी ही बाब समोर आणली होती. लीलाधर वाजपेयी यांना पुढे करून त्यांनी या वादाला खतपाणी घातले होते. बटेश्वर प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांपैकी लीलाधर वाजपेयी हेदेखील एक होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा