शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे”: सरसंघचालक मोहन भागवत
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
नगरपरिषद निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा धडका, १० दिवसांत ५३ सभा; जनता कौल देईल का?
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्यात सर्वात मोठ्या डीलची तयारी...! संपूर्ण जग बघत राहणार, पाकिस्तान-चीनचं टेन्शन वाढणार
5
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
6
महापरिनिर्वाण दिन २०२५: मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष लोकल सेवा चालवणार; पाहा, वेळापत्रक
7
"...तर ताबडतोब देश सोडा!", डोनाल्ड ट्रम्प यांची मादुरो यांना फोनवर थेट धमकी; अमेरिका-व्हेनेझुएला युद्ध पेटणार?
8
अंत्यविधीसाठी कुटुंब परगावी, चोरट्यांनी साधली संधी; वॉशिंग मशीनमधील दागिने-पैसे केले लंपास
9
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
10
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
11
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
12
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
13
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
14
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
15
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
16
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
17
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
18
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
19
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
20
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:02 IST

काँग्रेस आणि भाजप नेते परत एकदा वीर सावरकरांवरुन आमने सामने आले आहेत.

नवी दिल्ली: वीर सावरकर पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंमध्ये सावरकरांचा फोटो दिसल्यानंतर हे प्रकरण उफाळून आले आहे. काँग्रेसच्या दौऱ्यात वीर सावरकरांचा फोटो दाखवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली, तर काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. बटेश्वर प्रकरणात वीर सावरकरांची माफी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची साक्ष यासंबंधीचा वादही त्यांनी उघड केला.

छपाईदरम्यान चूक झालीभाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरचा फोटो ट्विट केला होता. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मधोमध वीर सावरकरांचा फोटोही आहे. यावर काँग्रेसने स्वतःचा बचाव करत याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे. पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांचे चित्र हवे होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एका बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सांगितले की, पोस्टर डिझाइन करणाऱ्या मुलाने हे फोटो ऑनलाइन शोधले होते. त्यांने नीट न तपासता ही छपाई केल्याचे काँग्रेसचे म्हणने आहे.अमित मालवीय यांची खोचक टीकाहे पोस्टर केरळमधील एर्नाकुलम विमानतळाजवळ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोटोसोबत अमित मालवीय यांनी लिहिले – 'एर्नाकुलममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचाही फोटो आहे. उशीरा का होईना, राहुल गांधींना जाणीव झाली. राहुल यांचे पणजोबा नेहरू पंजाबच्या नाभा तुरुंगात असताना इंग्रजांना विनंती करुन अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर आले होते.' 

जयराम यांचा भाजपवर पलटवारअमित मालवीय यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. 'तुम्हाला वस्तुस्थिती माहित नाही. एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवून, तुम्ही बदनामी करता. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षही असे प्रश्न उपस्थित करत आहे. व्हीपी सिंग सरकारच्या काळात सीपीएम आणि भाजपची युती होती, तसाच प्रकार सुरू आहे,' असं ते म्हणाले.खेरांनी ‘बटेश्वर साक्षी’चा मुद्दा उपस्थित केलाकाँग्रेस नेते पवन खेरा यांनीही याबाबत भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली आणि त्यांनी कधीही दयेचा अर्ज लिहिला नाही. प्रथम सावरकरांनी, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि इतरांनी लिहिला. बटेश्वरच्या साक्षीचे काय?' असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.

काय आहे 1942चे बटेश्वर प्रकरण?

बटेश्वरचे प्रकरण 1942 सालचे आहे. या वादाने अटलबिहारी वाजपेयींचा कधी पिच्छा सोडला नाही. अटलबिहारी वाजपेयी हे आग्रा जवळील बटेश्वरचे रहिवासी होते. त्यांच्यावर आरोप आहे की, 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू असताना त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या घटनेची इंग्रजांसमोर साक्ष दिली होती, त्यामुळे 4 स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती. वाजपेयींनी या वादातून अनेकवेळा दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण 2004 मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत लढवणारे राम जेठमलानी यांनी ही बाब समोर आणली होती. लीलाधर वाजपेयी यांना पुढे करून त्यांनी या वादाला खतपाणी घातले होते. बटेश्वर प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांपैकी लीलाधर वाजपेयी हेदेखील एक होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा