शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाला राहुल जबाबदार नाहीत - काँग्रेसची स्पष्टोक्ती

By admin | Updated: May 20, 2016 09:15 IST

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या

नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशा आशयाच्या सूचना गुरुवारी पक्षातर्फे फेटाळण्यात आल्या. सोबतच पक्षाने गांधींभोवतीचे सुरक्षा कवच अधिक मजबूत केले.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी सरचिटणीस मुकुल वासनिक आणि प्रवक्ता आरपीएन सिंग यांच्यासोबत पत्रकारांशी बोलताना सांगितले की, प्रत्येक निवडणुकीचे आपले वेगळे मुद्दे असतात. आम्ही एखाद्या ठरावीक व्यक्तीच्या संदर्भातून मग ते तरुण गोगोई असोत वा ओमन चंडी राज्याच्या निवडणुकांकडे बघत नाही. कुठे सुधारणोची गरज आहे यावर आम्ही सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा करू. सोनिया आणि राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्याचप्रमाणो या वेळीसुद्धा राहुल यांनी जबाबदारी स्वीकारू नये काय, असा सवाल करण्यात आला असता ही अयोग्य सूचना आम्ही फेटाळून लावतो, असे काँग्रेसचे नेते म्हणाले. काँग्रेस आसाममध्ये 15 वर्षे आणि केरळात गेली पाच वर्षे सत्तेत राहिली आणि सक्षम नेतृत्व दिले याकडे सुरजेवाला यांनी लक्ष वेधले. 
निवडणुकीतील पराभवानंतर प्रियंका गांधी संघटनेत अधिक मोठी भूमिका वठविणार काय, हा प्रश्न अप्रासंगिक असल्याचे सांगून त्यांनी फेटाळला. तर पक्षाला आणखी चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती, हे वासनिक यांनी मान्य केले. तामिळनाडू, केरळ आणि पुडुच्चेरीत पक्षाचे प्रभारी असलेले वासनिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, या राज्यांमधील पराभवाची कारणो त्वरित सांगणो शक्य नाही.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवास कॉँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांना जबाबदार धरता येणार नाही, असे कॉँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. कॉँग्रेसच्या दृष्टीने ही चिंतेची गोष्ट असली तरी काँग्रेस पक्ष यातूनही ङोप घेईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
 
कठोर मेहनत करत राहणार
- राहुल गांधी
काँग्रेसशासित आसाम आणि केरळमध्ये पक्षाचा पराभव आणि पश्चिम बंगाल व तामिळनाडूत फारशी चांगली कामगिरी बजावू न शकल्यानंतर पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस लोकांचा विश्वास प्राप्त करेर्पयत कठोर मेहनत करेल, अशी ग्वाही गुरुवारी दिली. राहुल गांधी टि¦टरवर म्हणाले, आम्ही जनतेचा हा निर्णय नम्रपणो स्वीकारतो आणि निवडणुकीत विजयी  पक्षांना शुभेच्छा देतो. 
 
(वृत्तसंस्था)