शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती, पण नेमका विषय तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:37 IST

Rahul Gandhi Letter To PM Modi: राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एका वेगळ्या विषयावरून पत्र लिहिले आहे.

Rahul Gandhi Letter To PM Modi: आताच्या घडीला देशासह जगात वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे अमेरिका इस्रायल आणि इराण युद्ध थांबताना दिसत नाही. या युद्धाचा मोठा प्रभाव जगातील अनेक देशांवर होत असून, भारतही त्याला अपवाद नाही. या युद्धामुळे देशातील गॅस पुरवठ्यावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष यावरून देशातील भाजपा सरकारवर टीका करत आहेत. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही परराष्ट्र धोरणावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

दुसरीकडे देशातील काही राज्यांमध्ये निवडणुका लागत आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग येत असून, देशातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना एका वेगळ्या विषयावरून पत्र लिहिले आहे. राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून याची माहिती दिली आहे. 

राहुल गांधींनी लिहिले PM मोदींना पत्र; सोशल मीडियावर दिली माहिती

सामाजिक न्यायासाठी झटणारे महान योद्धा आणि बहुजन चेतनेचे मार्गदर्शक कांशीराम यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी माझी मागणी आहे. हा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान कांशीराम आणि लाखो बहुजनांना हक्क सहभाग आणि स्वाभिमानाचा मार्ग दाखविणाऱ्या संपूर्ण चळवळीला समर्पित असेल. या मागणीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती राहुल गांधी यांनी दिली. या पोस्टसह पत्राचा फोटोही शेअर केला आहे. 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध मान्यवरांची भारतरत्न पुरस्कार देण्याबाबत विविध गटांकडून मागणी केली जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली जाते. तसेच शरद पवार यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी मध्यंतरी करण्यात आली होती. तर, विराट कोहली, नितीश कुमार, नवीन पटनायक यांनाही भारतरत्न देण्यात यावे, अशी मागणी केली गेली. यात आता आणखी एका नावाची भर पडल्याचे म्हटले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Writes to PM Modi; Shares Information on Social Media

Web Summary : Rahul Gandhi requests Bharat Ratna for Kanshi Ram, a social justice champion. He informed about writing a letter to PM Modi regarding this. Various groups have demanded Bharat Ratna for other leaders too.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBharat Ratnaभारतरत्न