शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: विजयी घोषणेपूर्वीच सुनेत्रा पवारांचं सर्व कार्यकर्त्यांना भावूक आवाहन, म्हणाल्या...
2
केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी...
3
"हा शेवट नाही, ही तर फक्त सुरुवात आहे, विजयी जल्लोष नको, गुलालही उधळू नका" सुनेत्रा पवार भावूक!
4
इकडे 'विजय'चा राजकीय उदय, तिकडे 'सन टीव्ही'च्या स्टॉकला उतरती कळा; काय आहे कनेक्शन?
5
भाजपाचा विजय निश्चित होताच शुभेंदू अधिकारींचं मोठं विधान, विजयाचं गुपित उघड करत म्हणाले....
6
Suvendu Adhikari : "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले
7
पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... 
8
Election Results 2026: मतदारांचा दणका, तीन राज्यात 'सत्ता'बदल! कोणत्या राज्यात कोणाला मिळाला झटका?
9
अभिनेता विजय यांच्या पराभवाची अफवा ऐकून चाहत्याने उचचलं टोकाचं पाऊल; कृष्णागिरीत खळबळ
10
Gold Silver Price News: लग्नसराईच्या काळात सोनं-चांदी झाली स्वस्त; दिल्ली ते मुंबई काय आहे किंमत? पाहा २४K, २२K,१८K सोन्याचा दर
11
"आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा
12
पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...;  सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ
13
पनिहाटी मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला धक्का, आरजीकर बलात्कार पीडितेची आई आघाडीवर
14
SBI कडून ५० लाख रुपयांचं Home Loan हवंय? जाणून घ्या तुमच्या पगाराची अट आणि मासिक EMIचं गणित
15
अंगारक संकष्टी चतुर्थी २०२६: ५ मे रोजी 'असा' भरा इच्छापूर्तीचा कलश; बाप्पा दूर करेल सर्व विघ्नं!
16
Assembly Election Results 2026: पश्चिम बंगाल, तामिळनाडू ते केरळ; कुठे कोणता पक्ष आघाडीवर? निवडणूक आयोगाचे आकडे काय आहेत?
17
West Bengal: ममता बॅनर्जींच्या आधी बंगालमध्ये कोणाची होती हुकूमत? जाणून घ्या स्वातंत्र्यानंतरचा इतिहास
18
Canara Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹९५,३०० चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटी
19
जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे
20
ब्लॉकबस्टर एन्ट्री! अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाने शतक पूर्ण केले; बहुमत गाठणार?
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची अध्यक्ष होण्यास ना नाही

By admin | Updated: September 21, 2016 07:38 IST

माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्‍वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते;

हमीरपूर : माझ्या बहिणीवर माझा सर्वाधिक विश्‍वास आहे. तिने राजकारणात यावे, असे मला मनापासून वाटते; परंतु तो निर्णय तिलाच घ्यायचा आहे, असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे मांडले. उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. काँग्रेसच्या लागोपाठ पराभवांमुळे प्रियांका यांनी राजकारणात उतरावे यासाठी दबाव वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांना छेडले असता हा निर्णय सर्वस्वी प्रियांकाला घ्यायचा असल्याचे त्यांनी म्हटले. हैदराबाद : काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास राहुल गांधी यांची ना नाही, असे ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी मंगळवारी येथे सांगितले. प्रियांका गांधी यांच्याबाबत ते म्हणाले की, त्यांनी सक्रिय राजकारणात उतरावे, असे बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटते. तथापि, त्यांना तसे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.पक्षाचे प्रमुखपद स्वीकारण्यास त्यांची (राहुल) ना नाही. ते कधी स्वीकारायचे एवढाच काय तो मुद्दा आहे. त्यांना त्यांची वेळ ठरवू द्यावी. राजकारणात वेळ-काळ खूप महत्त्वपूर्ण असतो. त्यामुळे नेतृत्वाला आपली वेळ ठरवू द्या, असे ते म्हणाले. प्रियांका गांधींबाबत बोलायचे झाल्यास त्या आतापर्यंत राजकारणात नाहीत. त्यांना राजकारणात येण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. हा त्यांचा स्वत:चा निर्णय असून आम्ही त्याचा आदर करायला हवा. त्यांनी राजकारणात उतरावे, अशी बहुतांश काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना असून, त्यात गैर काही नाही; परंतु राजकारणात कधी यायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, आपण नाही ठरवू शकत, असेही त्यांनी नमूद केले.यावर्षीच्या प्रारंभी चार राज्यांत पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर दिग्विजयसिंह यांनी काँग्रेसला मोठय़ा शस्त्रक्रियेची गरज असल्याचे विधान केले होते. त्याबाबत छेडले असता दिग्विजयसिंह म्हणाले की, उत्तर प्रदेश, पंजाब आणि गोवा राज्यांत पक्षासमोर मोठी आव्हाने आहेत. आपले विधान योग्य होते. तथापि, नंतर काँग्रेस अध्यक्षा आजारी पडल्या. बदल होतील यात शंका नाही. हे बदल कधी करायचे याचा निर्णय काँग्रेस अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना घ्यायचा आहे. पक्ष संघटनेत दीर्घकाळापासून बदल झालेले नाहीत. बदल व्हावेत, असे प्रत्येकाला वाटते. याबाबत काँग्रेस अध्यक्षांना अंतिम निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला वाटते त्या गतीने पक्षात बदल होत नसल्यामुळे तुम्ही निराश आहात काय, या प्रश्नावर ते म्हणाले की, राजकारणात निराशा नसते. प्रत्येकाला कठीण परिस्थितीत जगण्याचे तंत्र आत्मसात करावे लागते. राजकारणात जसा चांगला काळ असतो, तसा वाईट काळही असतो. त्यामुळे आम्ही प्रतिकूलतेला संधीत रूपांतरित केले पाहिजे, असेही त्यांनी बोलून दाखवले. (वृत्तसंस्था)