शहरं
Join us  
Trending Stories
1
बिल्डर 'बाळा'चा गरीब ड्रायव्हरला अडकविण्याचा प्रयत्न; म्हणतोय, मी नाही तो गाडी चालवत होता...
2
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
3
बांग्लादेशी खासदाराला हनीट्रॅपमध्ये अडकवणारी महिला अटकेत; मुंबई कनेक्शनही समोर
4
Sunrisers Hyderabad Predicted XI, IPL 2024 SRH vs RR: पराभवातून धडा घेत SRH संघात करणार एक महत्त्वाचा बदल; अनुभवी स्टार खेळाडूची होणार 'एन्ट्री'
5
Arvind Kejriwal : "मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
6
घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
7
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
8
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
9
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
10
पंतप्रधान मोदींना भेटून गोविंदाने सांगितली 'मन की बात', म्हणाला - "हा माझ्यासाठी सन्मान.."
11
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
12
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
13
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
14
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
15
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
16
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
17
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
18
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
19
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
20
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 4:27 PM

सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे.

नवी दिल्लीः लडाखजवळ चीन अन् भारत आमनेसामने आल्यानं परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शाहांना हल्लाबोल केला आहे. सीमा सुरक्षासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक विधान केलं होतं. त्या विधानाचा हवाला देत राहुल गांधींनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले आहे की, प्रत्येकास सीमेचे वास्तव माहीत आहे, पण तुमच्या मनाच्या आनंदासाठी ‘शाह-यद’ हा विचार चांगला आहे. बिहारमध्ये एका रॅलीला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते की, भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्त्राईलनंतर संपूर्ण जग सहमत आहे की इतर कोणताही देश आपल्या सीमेचे रक्षण करण्यास सक्षम असेल तर तो भारत आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे हे विधान ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधी यांनी कविता लिहिली. त्या कवितेतून त्यांनी अमित शाहांचा खरपूस समाचार घेतला आहे. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनदरम्यान सीमा विवाद सुरू आहे. सीमेवर दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने आलेले आहेत आणि दोन्ही बाजूंकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनेक बैठकांच्या फे-या झाल्या. पण अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. भारत आणि चीन यांच्या सीमेवरील वादासंदर्भात गेल्या आठवड्यात राहुल गांधींनी सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. अलीकडेच त्यांनी असा प्रश्न केला होता की, कोणतेही चिनी सैनिक भारतीय हद्दीत शिरले नाहीत, याची खात्री सरकार करू शकेल का?चिनी सैन्य युद्धाच्या तयारीत व्यस्तभारत-चीन सीमा विवाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांनी मुत्सद्दीपणाचा आणि वाटाघाटीचा मार्ग निवडला असला तरी चिनी सैन्य सतत युद्धाच्या तयारीत व्यस्त आहे. तिबेट सीमेवर युद्धाचा सराव केल्यानंतर आता चिनी सैन्याने देखील चीनच्या वायव्य भागात डोंगरावर लढा देण्यासाठी युद्ध सराव केला आहे. चीनची अधिकृत मीडिया सातत्याने चिनी सैनिकी युद्धाचे व्हिडिओ शेअर करीत आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी