शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
2
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
4
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
5
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
6
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
7
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
8
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
9
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
10
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
11
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
12
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
13
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
14
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
15
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
16
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
17
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
18
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
19
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
20
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : कोरोना लशीवरुन राहुल गांधींनी मोदींना विचारले 'हे' चार प्रश्न!

By मोरेश्वर येरम | Updated: November 23, 2020 18:06 IST

कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

ठळक मुद्देकोरोनाची लस येण्याआधी मोदींनी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, राहुल यांचे आव्हानदेशात पुढील वर्षाच्या सुरुवातीला लस उपलब्ध होण्याची शक्यतालशी संदर्भात इंत्यभूत पारदर्शी माहिती केंद्राने जनतेला द्यावी अशी मागणी

नवी दिल्ली
देशात कोरोनाचे आकडे पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. राजस्थान, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने पुन्हा एकदा निर्बंध लादण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या लशीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून कोरोना लशीबाबत नवेनवी माहिती समोर येत आहे. पण याच लशीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लशी संदर्भात चार प्रश्न विचारले आहेत. कोरोना लस भारतीयांना उपलब्ध करुन देण्यापूर्वी पंतप्रधानांनी या चार प्रश्नांची उत्तरं द्यावीत असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. 

राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न...
१. उपलब्ध होणाऱ्या करोना लशींमधून भारत सरकार कोणत्या लशीची निवड करणार? आणि का?
२. सर्वात प्रथम कोरोनाची लस कुणासाठी उपलब्ध करुन दिली जाईल? आणि त्याच्या वितरणाची सरकारची योजना काय?
३. लस मोफत उपलब्ध होईल यासाठी पीएम केअर फंडाचा वापर केला जाणार का?
४. भारतीयांना केव्हापर्यंत लस दिली जाणार?

 

कोरोनावरील लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिली होती. त्यानंतर कोवॅक्सीन आणि कोविशील्ड या लशी पुढील वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचंही वृत्त समोर आलं आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे चार सवाल उपस्थित करुन मोदींवर निशाणा साधला आहे. 

देशात सध्या कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने ९१ लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४,०५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे वाढते आकडे भारताची चिंता वाढवणारे ठरत आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. तर अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. पण रुग्णांच्या संख्येची हीच गती कायम राहिल्यास भारत प्रथम क्रमांकावर पोहोचेल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. 

कोरोनामुळे भारतात आतापर्यंत ३३ हजार ७३८ जणांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. तर आतापर्यंत एकूण ८५ लाख ६२ हजार जणांना कोरोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत ४१,०२४ रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपा