शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दशकभरात देशातील मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांची वाढ

By admin | Updated: January 22, 2015 14:34 IST

देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - देशातील गेल्या दशकभरातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार असून देशातील लोकसंख्या वाढीचा दर सरासरी १८ टक्के इतका असून मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्के वाढ झाली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, २००१ साली मुस्लिमांची लोकसंख्या १३.४ टक्के होती ती वाढून २०११ मध्ये १४.२ टक्के इतकी झाली. राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर आजही अधिक असला तरी नव्वदच्या दशकातील आकडेवारीच्या तुलनेत लोकसंख्या वाढीचा दर मंदावला आहे. १९९१ ते २००१ या काळात मुस्लिम लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता, मात्र आता तो २४ टक्क्यांवर आला आहे. 
आसाम व त्यापाठोपाठ पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांच्या संख्येत सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. २००१ च्या जनगणनेनुसार आसाममध्ये ३०.९ टक्के इतके मुस्लिम होते, मात्र दशकभरानंतर २०११ साली तोच आकडा ३४. २ टक्के इतका झाला. तर बांग्लादेशमधून होणा-या घुसखोरीमुळे नागरिकांमुळे पश्चिम बंगालमधील मुस्लिमांची संख्या २५.२ टक्क्यांवरून २७ टक्के झाली आहे. 
उत्तराखंडमध्ये मुस्लिमांच्या लोकसंख्येत तब्बल २ टक्के वाढ दिसून आली. राज्यात २००१ साली ११.९ टक्के नागरिक होते तोच आकडा २०११ साली १३.९ टक्के इतका होता. 
केरळमध्ये २००१ साली २४.७ मुस्लिम होते, २०११ साली तीच आकडेवारी २६.६ टक्के इतकी होती., तर गोव्यात २००१ साली ६.८ टक्के मुस्लिम होते, २०११ साली तो आकडा ८.४ टक्के इतका होता. जम्मू काश्मीरमधील लोकसंख्या दशकभरात ६७ टक्क्यांवरून ६८. ३ टक्क्यांवर तर हरियातील लोकसंख्या ५.८ टक्क्यांवरून ७ टक्क्यांवर आणि दिल्लीतील मुस्लिमांची लोकसंख्या ११.७ टक्क्यांवरून १२.९ टक्के इतकी झाली